शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

विवाहसंस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी व्यभिचार हा गुन्हाच समजला पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:02 PM

भारतीय दंड संहितेच्या कलम 497 नुसार जो पुरुष आपली पत्नी नसणाऱ्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवतो तो कारवाईस पात्र आहे.

नवी दिल्ली- भारतीय संस्कृतीमध्ये विवाहसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे या संस्थेचे पावित्र्य कायम राखण्यासाठी व्यभिचाराला गुन्हा म्हणूनच ठेवणे आवश्यक आहे असे मत केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज मांडले गेले.भारतीय दंड संहितेच्या कलम 497 नुसार जो पुरुष आपली पत्नी नसणाऱ्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवतो तो कारवाईस पात्र आहे. हा कायदा रद्द करणे म्हणजे भारतीय संस्कृतीत परमोच्च स्थानावर असणाऱ्या विवाहसंस्थेचे पावित्र्य भंग करणे असे होईल असे मत केंद्र सरकारतर्फे मांडले गेले. हा कायदा भारतीय विवाहसंस्थेच्या पावित्र्याला जपण्यासाठी तयार केला गेला होता. जर हा कायदा रद्द झाला तर विवाहबंध कमकुवत होतील असे शपथपत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले.केरळमधील जोसेफ शिन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकार आपली बाजू मांडत होते. जोसेफ यांनी व्यभिचारामध्ये केवळ पुरुषालाच का दोषी धरले जाते, त्याबरोबर संबंधित महिलेलाही दोषी ठरवण्यात यावे असा प्रश्न विचारणारी याचिका दाखल केली आहे. यावर सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्यायाधीश ए.एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत