शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

इंग्रज अथवा काँग्रेस जबाबदार नाही का...? ‘भिके’संदर्भातील वक्तव्यावर स्पष्टिकरण देत कंगनाचा 'पोस्ट बॉम्ब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 13:16 IST

'भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना काय माहीत होते, की ब्रिटीश आणि आमचे राष्ट्रनिर्माते अखंड भारताचे दोन तुकडे करतील, ज्यामुळे दहा लाख लोकांची कत्तल होईल.'

कंगना रणौतवर (Kangana Ranaut) तिच्या एका वक्तव्यामुळे प्रचंड टीका होत आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला 'भीक', असे संबोधून खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे तिने म्हटले आहे. यासंदर्भात तिने शनिवारी एक पोस्ट करत म्हटले होते की, जर तिची चूक कुणी सिद्ध केली, तर ती पद्मश्री परत करेल. यानंतर आता कंगनाने पुन्हा एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. एका लेखाचा हवाला देत, तिने म्हटले आहे, की जर तुम्ही तो समजून घेतला, तर तिने जे म्हटले आहे, ते समजू शकेल.

कंगनाने म्हटले आहे, 2015 मध्ये बीबीसीत एक लेख प्रसिद्ध झाला होता. यात त्याचे उत्तर मिळू शकते. तिने लिहिले आहे, 'आपल्या राष्ट्र निर्मात्यांनी, भारतात करण्यात आलेले असंख्य अपराध, आपल्या देशाची संपत्ती लुटणे, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची निर्घृण हत्या करणे, देशाचे दोन तुकडे करणे आणि स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या गुन्हे यांसाठी इंग्रजांना जबाबदार ठरवले नाही.'

काय म्हणाली कंगना -दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार भारत सोडला. विन्स्टन चर्चिल यांना युद्धवीर म्हणून गौरवण्यात आले. बंगालच्या उपासमारीला हीच व्यक्ती जबाबदार होती. स्वतंत्र भारतातील न्यायालयांमध्ये त्याच्यावर खटला चालला गेला? नाही. सिरिल रॅडक्लिफ ही इंग्रज व्यक्ती कधीही भारतात आली नव्हती, त्याला फाळणीच्या पाच आठवडे आधी भारतात आणण्यात आले होते.‘

काँग्रेस आणि इंग्रजांना ठरवलं जबाबदार -ब्रिटिशांनी फाळणीसंदर्भात ज्या अटी ठरविल्या होत्या, त्या समितीत काँग्रेस आणि मुस्लीम लीगचे सदस्य होते. फाळणीच्या वेळी 10 लाख लोक मारले गेले. जे मेले त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? फाळणीची लाइन ओढणारे ब्रिटिश अथवा काँग्रेस त्या नरसंहाराला जबाबदार नव्हते का?'

स्वातंत्र्यसेनानींसाठी लिहिलं... -कंगना रणौतने पुढे ब्रिटिश सरकारला पाठवलेल्या एका पत्राचाही उल्लेख केला आहे. ती लिहिते, 'भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना काय माहीत होते, की ब्रिटीश आणि आमचे राष्ट्रनिर्माते अखंड भारताचे दोन तुकडे करतील, ज्यामुळे दहा लाख लोकांची कत्तल होईल.'

शेवटी तिने म्हटले की, 'मी एवढेच बोलून माझे म्हणणे संपवते की, जर आपण भारतातील असंख्य गुन्ह्यांसाठी इंग्रजांना जबाबदार धरत नसू, तरी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच करत आहोत.'

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतbollywoodबॉलिवूडcongressकाँग्रेसInstagramइन्स्टाग्राम