शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

इंग्रज अथवा काँग्रेस जबाबदार नाही का...? ‘भिके’संदर्भातील वक्तव्यावर स्पष्टिकरण देत कंगनाचा 'पोस्ट बॉम्ब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 13:16 IST

'भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना काय माहीत होते, की ब्रिटीश आणि आमचे राष्ट्रनिर्माते अखंड भारताचे दोन तुकडे करतील, ज्यामुळे दहा लाख लोकांची कत्तल होईल.'

कंगना रणौतवर (Kangana Ranaut) तिच्या एका वक्तव्यामुळे प्रचंड टीका होत आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला 'भीक', असे संबोधून खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे तिने म्हटले आहे. यासंदर्भात तिने शनिवारी एक पोस्ट करत म्हटले होते की, जर तिची चूक कुणी सिद्ध केली, तर ती पद्मश्री परत करेल. यानंतर आता कंगनाने पुन्हा एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. एका लेखाचा हवाला देत, तिने म्हटले आहे, की जर तुम्ही तो समजून घेतला, तर तिने जे म्हटले आहे, ते समजू शकेल.

कंगनाने म्हटले आहे, 2015 मध्ये बीबीसीत एक लेख प्रसिद्ध झाला होता. यात त्याचे उत्तर मिळू शकते. तिने लिहिले आहे, 'आपल्या राष्ट्र निर्मात्यांनी, भारतात करण्यात आलेले असंख्य अपराध, आपल्या देशाची संपत्ती लुटणे, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची निर्घृण हत्या करणे, देशाचे दोन तुकडे करणे आणि स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या गुन्हे यांसाठी इंग्रजांना जबाबदार ठरवले नाही.'

काय म्हणाली कंगना -दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार भारत सोडला. विन्स्टन चर्चिल यांना युद्धवीर म्हणून गौरवण्यात आले. बंगालच्या उपासमारीला हीच व्यक्ती जबाबदार होती. स्वतंत्र भारतातील न्यायालयांमध्ये त्याच्यावर खटला चालला गेला? नाही. सिरिल रॅडक्लिफ ही इंग्रज व्यक्ती कधीही भारतात आली नव्हती, त्याला फाळणीच्या पाच आठवडे आधी भारतात आणण्यात आले होते.‘

काँग्रेस आणि इंग्रजांना ठरवलं जबाबदार -ब्रिटिशांनी फाळणीसंदर्भात ज्या अटी ठरविल्या होत्या, त्या समितीत काँग्रेस आणि मुस्लीम लीगचे सदस्य होते. फाळणीच्या वेळी 10 लाख लोक मारले गेले. जे मेले त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? फाळणीची लाइन ओढणारे ब्रिटिश अथवा काँग्रेस त्या नरसंहाराला जबाबदार नव्हते का?'

स्वातंत्र्यसेनानींसाठी लिहिलं... -कंगना रणौतने पुढे ब्रिटिश सरकारला पाठवलेल्या एका पत्राचाही उल्लेख केला आहे. ती लिहिते, 'भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना काय माहीत होते, की ब्रिटीश आणि आमचे राष्ट्रनिर्माते अखंड भारताचे दोन तुकडे करतील, ज्यामुळे दहा लाख लोकांची कत्तल होईल.'

शेवटी तिने म्हटले की, 'मी एवढेच बोलून माझे म्हणणे संपवते की, जर आपण भारतातील असंख्य गुन्ह्यांसाठी इंग्रजांना जबाबदार धरत नसू, तरी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच करत आहोत.'

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतbollywoodबॉलिवूडcongressकाँग्रेसInstagramइन्स्टाग्राम