शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रज अथवा काँग्रेस जबाबदार नाही का...? ‘भिके’संदर्भातील वक्तव्यावर स्पष्टिकरण देत कंगनाचा 'पोस्ट बॉम्ब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 13:16 IST

'भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना काय माहीत होते, की ब्रिटीश आणि आमचे राष्ट्रनिर्माते अखंड भारताचे दोन तुकडे करतील, ज्यामुळे दहा लाख लोकांची कत्तल होईल.'

कंगना रणौतवर (Kangana Ranaut) तिच्या एका वक्तव्यामुळे प्रचंड टीका होत आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला 'भीक', असे संबोधून खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे तिने म्हटले आहे. यासंदर्भात तिने शनिवारी एक पोस्ट करत म्हटले होते की, जर तिची चूक कुणी सिद्ध केली, तर ती पद्मश्री परत करेल. यानंतर आता कंगनाने पुन्हा एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. एका लेखाचा हवाला देत, तिने म्हटले आहे, की जर तुम्ही तो समजून घेतला, तर तिने जे म्हटले आहे, ते समजू शकेल.

कंगनाने म्हटले आहे, 2015 मध्ये बीबीसीत एक लेख प्रसिद्ध झाला होता. यात त्याचे उत्तर मिळू शकते. तिने लिहिले आहे, 'आपल्या राष्ट्र निर्मात्यांनी, भारतात करण्यात आलेले असंख्य अपराध, आपल्या देशाची संपत्ती लुटणे, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची निर्घृण हत्या करणे, देशाचे दोन तुकडे करणे आणि स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या गुन्हे यांसाठी इंग्रजांना जबाबदार ठरवले नाही.'

काय म्हणाली कंगना -दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार भारत सोडला. विन्स्टन चर्चिल यांना युद्धवीर म्हणून गौरवण्यात आले. बंगालच्या उपासमारीला हीच व्यक्ती जबाबदार होती. स्वतंत्र भारतातील न्यायालयांमध्ये त्याच्यावर खटला चालला गेला? नाही. सिरिल रॅडक्लिफ ही इंग्रज व्यक्ती कधीही भारतात आली नव्हती, त्याला फाळणीच्या पाच आठवडे आधी भारतात आणण्यात आले होते.‘

काँग्रेस आणि इंग्रजांना ठरवलं जबाबदार -ब्रिटिशांनी फाळणीसंदर्भात ज्या अटी ठरविल्या होत्या, त्या समितीत काँग्रेस आणि मुस्लीम लीगचे सदस्य होते. फाळणीच्या वेळी 10 लाख लोक मारले गेले. जे मेले त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? फाळणीची लाइन ओढणारे ब्रिटिश अथवा काँग्रेस त्या नरसंहाराला जबाबदार नव्हते का?'

स्वातंत्र्यसेनानींसाठी लिहिलं... -कंगना रणौतने पुढे ब्रिटिश सरकारला पाठवलेल्या एका पत्राचाही उल्लेख केला आहे. ती लिहिते, 'भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना काय माहीत होते, की ब्रिटीश आणि आमचे राष्ट्रनिर्माते अखंड भारताचे दोन तुकडे करतील, ज्यामुळे दहा लाख लोकांची कत्तल होईल.'

शेवटी तिने म्हटले की, 'मी एवढेच बोलून माझे म्हणणे संपवते की, जर आपण भारतातील असंख्य गुन्ह्यांसाठी इंग्रजांना जबाबदार धरत नसू, तरी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच करत आहोत.'

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतbollywoodबॉलिवूडcongressकाँग्रेसInstagramइन्स्टाग्राम