शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:25 IST

ABS and Two Helmets Mandatory for all New Two-Wheelers: केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाढते दुचाकी अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून बाजारात येणाऱ्या नवीन दुचाकींसाठी (स्कूटर आणि मोटारसायकल) एबीएस (Anti-lock Braking System) सक्तीचे करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन दुचाकी दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा केली आहे. वाढते रस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्यू याला आळा घालण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. 

सध्या एबीएस (Anti-lock Braking System) १२५ सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे हे. म्हणजे सध्या देशातील अंदाजे ४० टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाहीये. पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आले आहे.

एबीएस काय आहे? त्यामुळे काय होतं?

एबीएस (Anti-lock Braking System) हे वाहनांमध्ये वापरले जाणारे नव तंत्रज्ञान आहे. Anti-lock Braking System (ABS) हे एक प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे, जी वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरली जाते. 

एबीएस वाहनाच्या ब्रेक प्रणालीमध्ये वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अचानक वाहनाचा ब्रेक दाबल्यावर त्याची चाके लॉक होऊ नयेत. अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते. त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. ते टाळण्यासाठी आणि वाहन घसरू होऊ नये याची मदत होते.

एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळता येते. 

एबीएस अपघात रोखण्यासाठी किती परिणामकारक

जेव्हा अचानक ब्रेक लावला जातो, तेव्हा दुचाकीचे संतुलन बिघडले. पण, एबीएस असेल, तर दुचाकी अनियंत्रित होण्यापासून वा, घसरण्याचा धोका कमी असतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, एबीएसमुळे दुचाकींचा अपघात होण्याचा धोका ३४ ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

दोन हेल्मेट हवेच

केंद्र सरकारकडून एबीएस बरोबरच नवीन दुचाकी देताना दोन बीआयएस प्रामाणित हेल्मेट देणे अनिवार्य केले जाणार आहे. सध्या एकच हेल्मेट देणे सक्तीचे आहे. भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी ४४ टक्के मृत्यू हे दुचाकी वापरणाऱ्याचे होत आहेत. बहुतांश वेळा मृत्यू डोक्याला मार लागल्याने होत आहेत. त्यामुळे सरकारकडून या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातtwo wheelerटू व्हीलर