शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:25 IST

ABS and Two Helmets Mandatory for all New Two-Wheelers: केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाढते दुचाकी अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून बाजारात येणाऱ्या नवीन दुचाकींसाठी (स्कूटर आणि मोटारसायकल) एबीएस (Anti-lock Braking System) सक्तीचे करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन दुचाकी दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा केली आहे. वाढते रस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्यू याला आळा घालण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. 

सध्या एबीएस (Anti-lock Braking System) १२५ सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे हे. म्हणजे सध्या देशातील अंदाजे ४० टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाहीये. पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आले आहे.

एबीएस काय आहे? त्यामुळे काय होतं?

एबीएस (Anti-lock Braking System) हे वाहनांमध्ये वापरले जाणारे नव तंत्रज्ञान आहे. Anti-lock Braking System (ABS) हे एक प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे, जी वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरली जाते. 

एबीएस वाहनाच्या ब्रेक प्रणालीमध्ये वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अचानक वाहनाचा ब्रेक दाबल्यावर त्याची चाके लॉक होऊ नयेत. अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते. त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. ते टाळण्यासाठी आणि वाहन घसरू होऊ नये याची मदत होते.

एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळता येते. 

एबीएस अपघात रोखण्यासाठी किती परिणामकारक

जेव्हा अचानक ब्रेक लावला जातो, तेव्हा दुचाकीचे संतुलन बिघडले. पण, एबीएस असेल, तर दुचाकी अनियंत्रित होण्यापासून वा, घसरण्याचा धोका कमी असतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, एबीएसमुळे दुचाकींचा अपघात होण्याचा धोका ३४ ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

दोन हेल्मेट हवेच

केंद्र सरकारकडून एबीएस बरोबरच नवीन दुचाकी देताना दोन बीआयएस प्रामाणित हेल्मेट देणे अनिवार्य केले जाणार आहे. सध्या एकच हेल्मेट देणे सक्तीचे आहे. भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी ४४ टक्के मृत्यू हे दुचाकी वापरणाऱ्याचे होत आहेत. बहुतांश वेळा मृत्यू डोक्याला मार लागल्याने होत आहेत. त्यामुळे सरकारकडून या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातtwo wheelerटू व्हीलर