शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

देशातील 12 % नागरिक 'पिण्याच्या पाण्यापासून वंचित', घराजवळ मिळेना पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 10:34 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील दोन चिमुकल्या मुलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी चक्क गावापासून 14 किमी लांब रेल्वेनं प्रवास करावा लागतो

इंग्लडमधील एका स्वयंसेवी संस्थेने नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या पाण्याबद्दल सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, 12 टक्के भारतीयांना किंवा 163 दशलक्ष नागरिकांना घराजवळ पिण्याचे स्वच्छ पाणीदेखील मिळत नसल्याचे म्हटले आहे. देशातील बहुतांश भागातील पाण्याची परिस्थीत विदारक असल्याचंही 'वॉटर एड' या संस्थेनं आपल्या सर्वेक्षणातून म्हटलं आहे. विशेष म्हणजे संस्थेनं औरंगाबाद जिल्ह्यातील साक्षी आणि सिद्धार्थ यांच उदाहरण देत दुष्काळस्थिती दर्शवली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील दोन चिमुकल्या मुलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी चक्क गावापासून 14 किमी लांब रेल्वेनं प्रवास करावा लागतो. 9 वर्षीय साक्षी गरुड आणि तिचा शेजारी सिद्धार्थ ढगे (10) हे दररोज केवळ पाणी आणण्यासाठी रेल्वेने जातात. आपल्यासोबत नेलेले हांडे भरून पुन्हा गावाकडे परत येतात. पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांना एवढ्या दूरचा प्रवास करावा लागतो, ही बाब अत्यंत दुर्दैवी असून मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचं वास्तव मांडणारी आहे. यंदा मराठवाड्यातील काही भागात गतवर्षीच्या तुलनेत 14 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. 

पाण्यासाठी होणारी वणवण जाणारा द्यावा लागणारा वेळ, हे मला आवडत नाही. पण, दुसरा पर्यायच नाही, असे चिमुकला सिद्धार्थ म्हणतो. तर शाळेतून आल्यानंतर मला खेळायला वेळच मिळत नाही, कारण पाणी आणण्यासाठी जाणं हे माझं दैनिक काम झाल्याचं गरुड हिने सांगितलंय. इंग्लंडस्थित एका स्वयंसेवी संस्थेनं सिद्धार्थ आणि साक्षी यांच्यासारखीच दुष्काळी परिस्थिती देशातील बहुतांश भागात असल्याचं म्हटलं आहे. देशातील 12 टक्के नागरिक किंवा 161 दशलक्ष लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही राहत्या घराजवळ मिळत नाही, असे वॉटर एड संस्थेनं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक घरात पाईपाने पाणीपुरवठा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी 3.5 ट्रिलियन्स रुपयांचा खर्च करण्यात येणार असून 2024 पर्यंत हे पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. मात्र, खासगी पाणी पुरवठा किंवा विकतचे पाणी घेणे हे सिद्धार्थ आणि साक्षी यांच्यासारख्या कुटुंबीयांना परवडणारं नाही, असे त्यांच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ