शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

देशातील 12 % नागरिक 'पिण्याच्या पाण्यापासून वंचित', घराजवळ मिळेना पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 10:34 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील दोन चिमुकल्या मुलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी चक्क गावापासून 14 किमी लांब रेल्वेनं प्रवास करावा लागतो

इंग्लडमधील एका स्वयंसेवी संस्थेने नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या पाण्याबद्दल सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, 12 टक्के भारतीयांना किंवा 163 दशलक्ष नागरिकांना घराजवळ पिण्याचे स्वच्छ पाणीदेखील मिळत नसल्याचे म्हटले आहे. देशातील बहुतांश भागातील पाण्याची परिस्थीत विदारक असल्याचंही 'वॉटर एड' या संस्थेनं आपल्या सर्वेक्षणातून म्हटलं आहे. विशेष म्हणजे संस्थेनं औरंगाबाद जिल्ह्यातील साक्षी आणि सिद्धार्थ यांच उदाहरण देत दुष्काळस्थिती दर्शवली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील दोन चिमुकल्या मुलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी चक्क गावापासून 14 किमी लांब रेल्वेनं प्रवास करावा लागतो. 9 वर्षीय साक्षी गरुड आणि तिचा शेजारी सिद्धार्थ ढगे (10) हे दररोज केवळ पाणी आणण्यासाठी रेल्वेने जातात. आपल्यासोबत नेलेले हांडे भरून पुन्हा गावाकडे परत येतात. पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांना एवढ्या दूरचा प्रवास करावा लागतो, ही बाब अत्यंत दुर्दैवी असून मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचं वास्तव मांडणारी आहे. यंदा मराठवाड्यातील काही भागात गतवर्षीच्या तुलनेत 14 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. 

पाण्यासाठी होणारी वणवण जाणारा द्यावा लागणारा वेळ, हे मला आवडत नाही. पण, दुसरा पर्यायच नाही, असे चिमुकला सिद्धार्थ म्हणतो. तर शाळेतून आल्यानंतर मला खेळायला वेळच मिळत नाही, कारण पाणी आणण्यासाठी जाणं हे माझं दैनिक काम झाल्याचं गरुड हिने सांगितलंय. इंग्लंडस्थित एका स्वयंसेवी संस्थेनं सिद्धार्थ आणि साक्षी यांच्यासारखीच दुष्काळी परिस्थिती देशातील बहुतांश भागात असल्याचं म्हटलं आहे. देशातील 12 टक्के नागरिक किंवा 161 दशलक्ष लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही राहत्या घराजवळ मिळत नाही, असे वॉटर एड संस्थेनं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक घरात पाईपाने पाणीपुरवठा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी 3.5 ट्रिलियन्स रुपयांचा खर्च करण्यात येणार असून 2024 पर्यंत हे पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. मात्र, खासगी पाणी पुरवठा किंवा विकतचे पाणी घेणे हे सिद्धार्थ आणि साक्षी यांच्यासारख्या कुटुंबीयांना परवडणारं नाही, असे त्यांच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ