शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवं! धीरेंद्र शास्त्रींची मागणी; लवकरच लग्न करणार असल्याचीही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 17:02 IST

धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात.

रायपूर: मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या शास्त्री यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. रायपूर येथे एक मोठे विधान केले असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्याकडे चंद्रखुरीचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. चंद्रखुरी या जागेचे नाव बदलून कौशल्य धाम ठेवावे, असे ते म्हणाले. मागील सरकारमुळे छत्तीसगडमध्ये धर्मांतर वाढले. ते दिशाहीन लोक होते, त्यामुळे येथे धर्मांतर वाढले, असे धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले. तसेच मी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जाती मोजण्यात काहीच अर्थ नाही, किती गरीब आहेत आणि किती त्रस्त आहेत याचा हिशोब व्हायला हवा. मंदिरे पाडू नका, चादरी अर्पण करणे हा चमत्कार आहे, मेणबत्ती लावणे हा चमत्कार आहे, मग मी जर दैवी दरबार लावला किंवा हनुमान चालीसा वाचली तर लोकांचे पोट का दुखते, असा प्रश्न त्यांनी केला. 

चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवंखरं तर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या याच कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी धर्मांतराबाबत मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, राज्यात प्रचंड प्रमाणात धर्मांतर होत आहे. विशेषतः जशपूरमध्ये लोक धर्मांतर करत आहेत. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप सिंग जुदेव यांच्या कुटुंबाने घरवापसी मोहीम सुरू केली. त्यांनी लोकांचे पाय धुवून त्यांना घरी परतायला भाग पाडले. दिलीप सिंग यांच्यानंतर त्यांचा मुलगा ही जबाबदारी पार पाडत आहे.

दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री यांच्या घरवापसीच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडले. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी भाजपा विरोधी पक्षात असताना धर्मांतर होत असल्याच आरोप केला. राज्यात आता भाजपाचे सरकार आले आहे आणि केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे भाजपाने पोकळ विधाने करून जनतेची दिशाभूल करू नये. धर्मांतराच्या विरोधात कायदा करायला हवा, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडbageshwar dhamबागेश्वर धामBJPभाजपाcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री