शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

पंतप्रधान मोदींचा नारा बदलला; 'मैं देश नहीं बिकने दूंगा' नव्हे, 'मैं देश नहीं बचने दूंगा', खासदाराची कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 11:15 IST

एक 'सपूत' असतो, जो आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढतो, तर एक 'कपूत' असतो जो कुटुंबाची संपत्ती विकतो. (Mai desh nahi bachane dunga.)

नवी दिल्ली- केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर, आम आदमी पक्षाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा होती, की "देश नहीं बिकने दूंगा." मात्र, आता उद्योग पतींच्या प्रेमाखात त्यांनी आपली घोषणा बदलली आहे. आता पंतप्रधान मोदींची घोषणा "मैं देश नहीं बचने दूंगा," अशी झाली असल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये संजय सिंह यांनी म्हटले आहे, पीएम मोदी एकदा म्हणाले होते की, 'ये देश नहीं बिकने दूंगा. मैं देश नहीं मिटने दूंगा, मात्र, अर्थसंकल्प पाहिल्यानंतर चार ओळी सुचतात. पंतप्रधानांची घोषणा बदली आहे. ‘ये देश नहीं बचने दूंगा…ये खेत-खलिहान नहीं बचने दूंगा, किसान नहीं बचने दूंगा…नौजवान नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा… ये देश नहीं बचने दूंगा, व्यापार नहीं बचने दूंगा… कर्मचारी नहीं बचने दूंगा, बैंक नहीं बचने दूंगा…LIC नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा… ये देश नहीं बचने दूंगा, ये सेल नहीं बचने दूंगा… ये रेल नहीं बचने दूंगा, BPCL नहीं बचने दूंगा… एयरपोर्ट नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा…ये देश नहीं बचने दूंगा.’

पतंजली पाच लाख तरुणांना देणार रोजगार; अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांची मोठी घोषणा

आप खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत सवाल केला आहे, की त्यांच्या सरकारने अर्थसंकल्प नेमका कुणासाठी तयार केला? चार भांडवलदारांसाठी तयार केला. त्यांना फायदा करून देण्यासाठी आणि संपूर्ण देश त्यांनाच विकण्यासाठी तयार केलाय. देशाच्या जनतेला समजले आहे, की मोदी देशाचे नाही तर केवळ चार भांडवलदार मित्रांचेच पंतप्रधान आहेत. त्यांच्याच हातात देशाची संपत्ती गहाण ठेऊन सर्व काही विकण्याचा विचार आहे. एक 'सपूत' असतो, जो आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढतो, तर एक 'कपूत' असतो जो कुटुंबाची संपत्ती विकतो.

पेट्रोलच्या किंमतीवरून 'राम-रावण'!; 'या' ज्येष्ठ खासदाराकडून मोदींना घरचा आहेर!

आप शिवाय इतर राजकीय पक्षांनीही मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. गरिबांच्या हातात रोख येईल, हे आता विसरून जा. मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. तर, दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे काही राज्यांमधील निवडणुकांसाठी तयार केलेला मार्ग आहे. गरिबांच्या हातात रोख मिळेल, अशा काही तरतुदी यात करण्यात येतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, खासगीकरण आणि निर्गुंतवणूक करत देश विक्रीसाठी ठेवला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे का, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीMember of parliamentखासदारBJPभाजपा