शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Arvind Kejriwal : "आणखी एक हत्या, दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"; केजरीवालांचा केंद्राला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:14 IST

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल गेल्या काही काळापासून दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत केंद्र सरकार आणि भाजपावर सातत्याने जोरदार निशाणा साधत आहेत.

दिल्लीतील नरेला येथे शनिवारी सकाळी आणखी एका तरुणाच्या हत्येनंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. दिल्लीतील जनता किती दिवस अशा घटना सहन करणार आहे? असा सवाल त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला विचारला आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "दिल्लीमध्ये आणखी एक वेदनादायक हत्या. दिल्लीत रक्त वाहत आहे आणि केंद्रातील भाजपा सरकार हातावर हात ठेवून गप्प बसली आहे. दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"

अरविंद केजरीवाल गेल्या काही काळापासून दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत केंद्र सरकार आणि भाजपावर सातत्याने जोरदार निशाणा साधत आहेत. आता त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दिल्लीतील जनतेने केंद्र आणि भाजपावर एकच जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्थेची आहे. ती पूर्ण करण्यातही भाजपा अपयशी ठरली असा आरोप केला आहे. दिल्लीत दररोज खून, दरोडा, लुटमारीच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीतील महिलांसह सर्वांनाच असुरक्षित वाटत आहे. दिल्ली पोलीस काहीच करू शकत नाहीत असंही म्हटलं. 

दिल्लीतील शाळा बॉम्बने उडवण्याच्या धमकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं. गुन्हेगार आणि धमकावणाऱ्यांचं मनोबल उंचावले आहे. शाळांना बॉम्बची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अद्याप पकडण्यात आलेलं नाही. दिल्लीतील जनतेला सुरक्षा देण्यात अमित शाह अपयशी ठरले आहेत. आता गृहमंत्र्यांनी दिल्लीतील जनतेमध्ये येऊन उत्तर द्यावं असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी