शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

Arvind Kejriwal : "आणखी एक हत्या, दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"; केजरीवालांचा केंद्राला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:14 IST

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल गेल्या काही काळापासून दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत केंद्र सरकार आणि भाजपावर सातत्याने जोरदार निशाणा साधत आहेत.

दिल्लीतील नरेला येथे शनिवारी सकाळी आणखी एका तरुणाच्या हत्येनंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. दिल्लीतील जनता किती दिवस अशा घटना सहन करणार आहे? असा सवाल त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला विचारला आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "दिल्लीमध्ये आणखी एक वेदनादायक हत्या. दिल्लीत रक्त वाहत आहे आणि केंद्रातील भाजपा सरकार हातावर हात ठेवून गप्प बसली आहे. दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"

अरविंद केजरीवाल गेल्या काही काळापासून दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत केंद्र सरकार आणि भाजपावर सातत्याने जोरदार निशाणा साधत आहेत. आता त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दिल्लीतील जनतेने केंद्र आणि भाजपावर एकच जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्थेची आहे. ती पूर्ण करण्यातही भाजपा अपयशी ठरली असा आरोप केला आहे. दिल्लीत दररोज खून, दरोडा, लुटमारीच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीतील महिलांसह सर्वांनाच असुरक्षित वाटत आहे. दिल्ली पोलीस काहीच करू शकत नाहीत असंही म्हटलं. 

दिल्लीतील शाळा बॉम्बने उडवण्याच्या धमकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं. गुन्हेगार आणि धमकावणाऱ्यांचं मनोबल उंचावले आहे. शाळांना बॉम्बची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अद्याप पकडण्यात आलेलं नाही. दिल्लीतील जनतेला सुरक्षा देण्यात अमित शाह अपयशी ठरले आहेत. आता गृहमंत्र्यांनी दिल्लीतील जनतेमध्ये येऊन उत्तर द्यावं असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी