शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नवरदेव खाली उतरताच घोडीचा मृत्यू; तिच्या बहिणीसह मालकाने गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:43 IST

राजस्थानमधील उदयपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे मिरवणुकीत विजेचा धक्का लागून पायल नावाच्या घोडीचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी घोडीच्या मालकाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. लक्षणीय बाब म्हणजे मालकासोबत खुशबू ही मृत घोडीची खरी बहीण देखील होती. पायलच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी येथे घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर निवेदन घेण्यासाठी एडीएम ओपी बनकर यांना कार्यालयातून बाहेर पडावे लागले.

दरम्यान, एडीएमसमोर मालकाने मृत घोडीची बहिण खुशबू हिला तुझी बहीण पायलला न्याय हवा आहे का, असे विचारले असता तिने मान डोलावून होकार दिला. खरं तर तीन दिवसांपूर्वी लग्नाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागल्याने घोडीचा मृत्यू झाल्याचे घोडी मालकाने सांगितले. त्यांनी उद्यान व्यवस्थापन, तंबू मालक आणि लाईट डेकोरेशनमध्ये निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

नवरदेव खाली उतरताच विजेच्या धक्क्याने घोडीचा मृत्यू घोडीचे मालक हम्माद सिद्धिक यांनी सांगितले की, नवरदेव घोडीवरून खाली उतरताच तो थोडा पुढे सरकला आणि घोडीचा पाय उघड्या विजेच्या तारांच्या कचाट्यात आला. मी उपस्थितांना वीज घालवावी असे सांगितले. पण लाईट बंद केल्यावर घोडी वेदनेने मरण पावली होती. घोडी चार महिन्यांची गरोदर होती. ही घटना सामान्य माणसाच्या लग्नातही घडू शकते. आजूबाजूला लहान मुलेही खेळत होती. या घटनेमुळे विवाह सोहळ्यात तीव्र नाराजी आहे. उद्याने आणि रिसॉर्ट्समध्ये सजावटीसाठी विजेच्या तारा लावल्या जातात. त्यांच्यात करंट आहे. घोडीच्या मृत्यूला तंबू आणि सजावट करणारे थेट जबाबदार आहेत. असा आरोपही मृत घोडीच्या मालकाने केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्नDeathमृत्यू