शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

संघर्षाची स्वप्नपूर्ती... साध्वी ऋतंभरा अन् माजी मंत्र्यांना अश्रू अनावर; राम मंदिराने आठवला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 15:30 IST

अयोध्या नगरीत आज रामभक्तांचा मेळा जमला असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज विधीव्रत ...

अयोध्या नगरीत आज रामभक्तांचा मेळा जमला असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज विधीव्रत पूजा करुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राम मंदिर उभारणीसाठी आंदोलन करणारे, आंदोलनात सहभागी होणारे कारसेवक देशाच्या विविध राज्यातून, जिल्ह्यातून अयोध्येला पोहोचले आहेत. ज्या कुटुंबातील कारसेवकांचे निधन झाले, त्यांच्या पुढील पिढ्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राऊन हा आनंद आणि तितकाच भावनिक क्षण साजरा करत आहेत. यावेळी, अनेकांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं.  

प्रभू श्रीराम यांचा गेल्या ५०० वर्षांपासूनच वनवास संपल्याचं अनेक कारसेवक म्हणतात. ५०० वर्षांपासूनची ही मंदिराची लढाई आज जिंकली. रामलला मोठ्या उत्साहात अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. राम मंदिर आंदोलनात सक्रीय असलेल्या माजी मंत्री उमा भारती याही गेल्या १० दिवसांपासून अयोध्येत आहेत. आजचा हा क्षण डोळ्यात साठवताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. 

राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने या आंदोलनातील अनेकांच्या गाठीभेटी झाली. ज्या स्वप्नासाठी एकत्र लढलो, ती स्वप्नपूर्ती कित्येक वर्षांनी झाल्याचा आनंद या सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसून येत आहे. सन १९९० च्या दशात भाजपा नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांनी सक्रीय सहभाग घेत तुरुंगवासही भोगला. उमा भारती यांनी मुंडण करुन या आंदोलनात सहभागी होत योददान दिलं होतं. आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा समोरा-समोर आल्या आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. दोघींनीही परस्परांना मिठी मारली अन् डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. राम जन्मभूमी आंदोलनातील ते सगळे क्षण, तो संघर्ष आणि तो इतिहास त्यांच्या डोळ्यासमोरुन तरळून गेला. आज हे भव्य राम मंदिर आणि दैपिप्यमान सोहळा पाहून त्यांचं मन भरुन आलं होतं.

उमा भारतीचं योगदान

मी १२ वर्षांची असल्यापासून या दिवसाची वाट पाहात होते. रामचंद्रास परमहंस यांनी मला ही जागा दाखवली होती. तेव्हा, बंद कुलूपात रामलला होते, केवळ पुजेसाठी ते कुलूप उघडले जात. हिंदू समाजाचा हा केवढा अपमान आहे, अशी भावना त्यावेळी माझ्या मनी होती. तेव्हापासूनच मी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले आहे. पहिल्यांदा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा आम्ही बांधाच्या तुरुंगात होतो. आमच्यासोबत मिश्रा, वसुंधरा आणि मेहता हेही होते. एका गेस्ट हाऊसला तुरुंगाचा दर्जा देऊन आम्हाला तेथे ठेवले होते. मात्र, मी डोक्याचं मुंडन करुन, वेश बदलून तेथून पळून गेले होते, अशी आठवण आणि रामजन्मभूमी आंदोलनातील आपला सहभाग उमा भारती यांनी यापूर्वी सांगितला होता.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUma Bhartiउमा भारतीNarendra Modiनरेंद्र मोदी