शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

एकत्र आत्महत्या करण्याचा इरादा पण ऐनवेळी प्रेयसीची माघार, प्रियकराची उडी अन् मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 15:36 IST

अनेकांनी आपल्या प्रेमासाठी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रेम आंधळं असतं... प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही, असं नेहमी बोललं जातं. अनेकांनी आपल्या प्रेमासाठी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच राजस्थानमधील बालोत्रा ​​येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे आत्महत्या करण्याच्या इराद्याने रेल्वे स्टेशनवर पोहचलेल्या प्रेमी युगुलातील तरूणीनं ऐनवेळी माघार घेतली पण तरूणाला आपला जीव गमवावा लागला. 

३४ वर्षीय प्रियकरानं रेल्वे येताच उडी मारली अन् जीवन संपवलं. मात्र, त्याच्या प्रेयसीनं अखेरच्या क्षणी तिचा निर्णय बदलला आणि माघार घेतली. खरं तर मृत प्रियकराला २ मुलं देखील आहेत. ही घटना गुरुवारी रात्री राजस्थानमधील बालोत्रा ​​जिल्ह्यातील पाचपदरा पोलीस स्टेशन परिसरात घडली.  

प्रियकराची उडी अन् मृत्यू  राजू भट्ट असं मृताचं नाव असून तो मजुरी करून उदरनिर्वाह करायचा. राजू विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. या घटनेनंतर राजूच्या कुटुंबीयांनी त्याची प्रेयसी रवीना (२०) आणि तिच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. एकाच गावात राहणारे राजू आणि रवीना यांच्यात मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. 

दरम्यान, लग्न होत नसल्याने राजू आणि रवीना यांच्यात वाद झाला आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघेही जवळच्या रेल्वे स्टेशनजवळ पोहचले. पण वेगवान ट्रेन आल्यावर ट्रेनचा वेग पाहून रवीना घाबरून मागे सरकली, मात्र तोपर्यंत राजूनं तिच्यासमोर उडी मारली होती. त्यानंतर रेल्वे गार्ड आणि स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांनी राजूचा मृतदेह बालोत्रा ​​स्थानकात आणला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून राजूचा मृतदेह रुग्णालयात नेला.

कुटुंबीयांचा गंभीर आरोप राजूच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार देत प्रेयसी रवीना आणि तिच्या कुटुंबीयांच्या अटकेची मागणी केली. याआधी देखील राजूला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप मृताच्या भावाने केला. महिलेच्या कुटुंबीयांनी राजूचा खून केला आणि त्याचा मृत्यू आत्महत्या करून झाला असं भासवण्यासाठी त्याचा मृतदेह ट्रॅकवर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूचं १५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्याला आठ आणि पाच वर्षांची दोन मुलं आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू