शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

पाऊस, महापुरामुळे देशभरात 993 जणांचा मृत्यू, 17 लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 09:26 IST

यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे.

नवी दिल्ली - यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे या पाच राज्यांमधील 17 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले असून, सुमारे 993 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पाऊस आणि महापुरामुळे 22 ऑगस्टपर्यंत देशात 993 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये केरळमधील सर्वाधिक 400 जणांचा समावेश  आहे.  गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार 2018मध्ये पूरस्थितीमुळे सुमारे 70 लाख लोकांना फटका बसला आहे. त्यापैकी सुमारे 17 लाख लोक विस्थापित झाले . या अहवालानुसार केरळबरोबरच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटकच्या विविध भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक नुकसान केरळमध्ये झाले आहे. केरळमध्ये 22 ऑगस्टपर्यंत 387 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा आकडा वाढून 400 च्या पुढे गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केरळबरोबरच मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये 204, पश्चिम बंगालमध्ये 195, कर्नाटकमध्ये 161 आणि आसाममध्ये 46 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये 54 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यापैकी 14 लाख 52 हजार लोकांना मदत केंद्रात आश्रय घ्यावा लागला आहे. त्याबरोबरच आसाममध्ये 11 लाख 46 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच सुमारे 2 लाख 45 हजार जणांना मदत केंद्रात पाठवण्यात आले आहे. याआधी 2017 मध्ये पाऊस आणि पुरामुळे 1200 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2016 साली पुरामुळे बिहारमध्ये 254 तर मध्य प्रदेशात 184 जणांचा मृत्यू झाला होता. पाऊस आणि पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक विशेष निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांना अद्याप तयार करू शकलेले नाही.  प्राप्त माहितीनुसार देशातील प्रत्येक राज्याकडे पूर आणि पावसाच्या संकटापासून पुरेशी साधने उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :floodपूरKerala Floodsकेरळ पूरRainपाऊस