शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

पाऊस, महापुरामुळे देशभरात 993 जणांचा मृत्यू, 17 लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 09:26 IST

यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे.

नवी दिल्ली - यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे या पाच राज्यांमधील 17 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले असून, सुमारे 993 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पाऊस आणि महापुरामुळे 22 ऑगस्टपर्यंत देशात 993 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये केरळमधील सर्वाधिक 400 जणांचा समावेश  आहे.  गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार 2018मध्ये पूरस्थितीमुळे सुमारे 70 लाख लोकांना फटका बसला आहे. त्यापैकी सुमारे 17 लाख लोक विस्थापित झाले . या अहवालानुसार केरळबरोबरच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटकच्या विविध भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक नुकसान केरळमध्ये झाले आहे. केरळमध्ये 22 ऑगस्टपर्यंत 387 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा आकडा वाढून 400 च्या पुढे गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केरळबरोबरच मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये 204, पश्चिम बंगालमध्ये 195, कर्नाटकमध्ये 161 आणि आसाममध्ये 46 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये 54 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यापैकी 14 लाख 52 हजार लोकांना मदत केंद्रात आश्रय घ्यावा लागला आहे. त्याबरोबरच आसाममध्ये 11 लाख 46 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच सुमारे 2 लाख 45 हजार जणांना मदत केंद्रात पाठवण्यात आले आहे. याआधी 2017 मध्ये पाऊस आणि पुरामुळे 1200 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2016 साली पुरामुळे बिहारमध्ये 254 तर मध्य प्रदेशात 184 जणांचा मृत्यू झाला होता. पाऊस आणि पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक विशेष निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांना अद्याप तयार करू शकलेले नाही.  प्राप्त माहितीनुसार देशातील प्रत्येक राज्याकडे पूर आणि पावसाच्या संकटापासून पुरेशी साधने उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :floodपूरKerala Floodsकेरळ पूरRainपाऊस