शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस, महापुरामुळे देशभरात 993 जणांचा मृत्यू, 17 लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 09:26 IST

यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे.

नवी दिल्ली - यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे या पाच राज्यांमधील 17 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले असून, सुमारे 993 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पाऊस आणि महापुरामुळे 22 ऑगस्टपर्यंत देशात 993 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये केरळमधील सर्वाधिक 400 जणांचा समावेश  आहे.  गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार 2018मध्ये पूरस्थितीमुळे सुमारे 70 लाख लोकांना फटका बसला आहे. त्यापैकी सुमारे 17 लाख लोक विस्थापित झाले . या अहवालानुसार केरळबरोबरच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटकच्या विविध भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक नुकसान केरळमध्ये झाले आहे. केरळमध्ये 22 ऑगस्टपर्यंत 387 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा आकडा वाढून 400 च्या पुढे गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केरळबरोबरच मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये 204, पश्चिम बंगालमध्ये 195, कर्नाटकमध्ये 161 आणि आसाममध्ये 46 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये 54 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यापैकी 14 लाख 52 हजार लोकांना मदत केंद्रात आश्रय घ्यावा लागला आहे. त्याबरोबरच आसाममध्ये 11 लाख 46 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच सुमारे 2 लाख 45 हजार जणांना मदत केंद्रात पाठवण्यात आले आहे. याआधी 2017 मध्ये पाऊस आणि पुरामुळे 1200 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2016 साली पुरामुळे बिहारमध्ये 254 तर मध्य प्रदेशात 184 जणांचा मृत्यू झाला होता. पाऊस आणि पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक विशेष निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांना अद्याप तयार करू शकलेले नाही.  प्राप्त माहितीनुसार देशातील प्रत्येक राज्याकडे पूर आणि पावसाच्या संकटापासून पुरेशी साधने उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :floodपूरKerala Floodsकेरळ पूरRainपाऊस