शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

...तर कंपनी घरबसल्या तुम्हाला देणार ९ महिन्यांचा पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 09:31 IST

भाजपा खासदारानं मांडलं खासगी विधेयक; मंजूर झाल्यास नोकरी गेल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार आधार

नवी दिल्ली: कोणतीही चूक नसताना नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच आर्थिक आधार मिळू शकतो. याविषयीचं एक खासगी विधेयक भाजपाचे राज्यसभेतले खासदार राकेश सिन्हा यांनी मांडलं आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास आर्थिक मंदी, मालकाची दिवाळखोरी, तंत्रज्ञानातले बदल यासारख्या कारणांमुळे नोकरी गमवावी लागलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीला ९ महिन्यांचा पगार द्यावा लागेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात सिन्हा यांनी हे विधेयक मांडलं. अद्याप हे विधेयक संसदेत मतदानासाठी आलेलं नाही. आर्थिक मंदी, तंत्रज्ञानात होणारे बदल, न्यायालयाचे आदेश, मालकाची दिवाळखोरी, कंपनी चालवण्यात मालकाला आलेलं अपयश यामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागते. अशा व्यक्तींना नव्या कायद्यानं आधार मिळू शकेल, अशी अपेक्षा सिन्हा यांनी व्यक्त केली. नोकरीवरुन काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या आरोग्य विम्याचा आणि इतर गोष्टींचा लाभ देण्यात यावा. कर्मचारी आणि कंपनी यांच्यात झालेल्या करारात तसा उल्लेख नसल्यास कंपनीनं कर्मचाऱ्याला नऊ महिने किंवा त्याला दुसरी नोकरी मिळेपर्यंत (यातील जी गोष्ट आधी होईल ती) त्याला पगार द्यावा, अशा तरतुदी विधेयकात आहेत. कर्मचाऱ्याची कोणतीही चूक नसताना त्याची नोकरी गेल्यास त्याला आर्थिक सहाय्य पुरवणारा कोणाताही कायदा सध्या अस्तित्वात नसल्याचं सिन्हा यांनी विधेयक सादर करताना म्हटलं. 'नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुटुंबाच्या वैद्यकीय, शैक्षणिक जबाबदाऱ्या असतात. नोकरी गेल्यावर पगार मिळाल्यास कर्मचाऱ्याला त्याच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करता येऊ शकतात,' असं सिन्हा म्हणाले. नोकरी करणारा कर्मचारी काही कर्ज घेतो. त्याच्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवतो. नोकरी गेल्यामुळे या सगळ्यावर परिणाम होता कामा नये. कर्मचाऱ्याची कोणतीही चूक नसताना त्याच्या कुटुंबाला फटका बसू नये, हा विधेयकामागील हेतू असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं. विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्याला नोकरी गेल्यानंतर नऊ महिने पगार मिळेल. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक ताण येणार नाही. या नऊ महिन्यांच्या काळात त्याला नवी नोकरी शोधता येईल, असं सिन्हा म्हणाले.  

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपा