शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Winter Session: “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीमुळं ७०० लोकांचा जीव गेला; भरपाई तर करावी लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:13 PM

शेतकरी आंदोलन केंद्र सरकारच्या चुकीमुळे झालं आहे. ज्यापद्धतीने संसदेत कुठलीही चर्चा न करता कायदे रद्द केले. हे पाहून सरकार चर्चेला घाबरलंय हे दिसतं अशी टीका राहुल गांधींनी केली.

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभं केले. २ महिन्यापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकलं. त्यानंतर हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी केली. संसदेत आज कृषी कायदे परत घेतल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचसोबत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला.

राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणाले की, देशातील ३-४ उद्योगपतींची ताकद भारतातील शेतकऱ्यांसमोर उभी राहू शकत नाही हे आम्हाला माहिती होतं. पंतप्रधानांनी माफी मागितली त्याचा अर्थ त्यांनी हे स्वीकार केले आहे की त्यांच्या चुकीमुळे ७०० लोकं मारली गेली. पंतप्रधानांच्या चुकीमुळे हे आंदोलन झालं. जर त्यांनी चूक स्वीकारली असेल तर नुकसान भरपाई करावीच लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलन केंद्र सरकारच्या चुकीमुळे झालं आहे. ज्यापद्धतीने संसदेत कुठलीही चर्चा न करता कायदे रद्द केले. हे पाहून सरकार चर्चेला घाबरलंय हे दिसतं. सरकारने चुकीचे केले हे त्यांना माहिती आहे. ७०० शेतकऱ्यांचा आंदोलनामुळे मृत्यू झाला. कायदा लागू करण्यामागे कुठली शक्ती होती? यावर चर्चा झाली पाहिजे होती परंतु सरकारने ते होऊ दिलं नाही असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला.

 

दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेले ३ काळे कायदे परत घ्यावे लागतील हे आम्ही यापूर्वीच सांगितले होते. ३-४ उद्योगपतींची शक्ती भारतातील शेतकऱ्यांसमोर उभी राहू शकत नाही. आणि तेच झालं काळे कायदे सरकारला रद्द करावे लागले. हा शेतकऱ्यांचा विजय आहे, देशाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना दिली.

संसदेत कृषी कायदे रद्द केले

केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत संमती देण्यात आली. त्यानंतर, संसदेच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, कुठल्याही चर्चेविना हे तिन्ही कायदे रद्द करण्यात आल्याने विरोधकांनी संसद सभागृहात गोंधळ घातला होता. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या कायद्यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता.    

नवे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देशात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन सुरू आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेद्र मोदींनी अखेर गुरू नानक जयंतीदिनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली. हा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करून तयार केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत हे तिन्ही कायदे रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, लोकसभा विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, चर्चेविना हे तिन्ही कायदे रद्द करण्यात आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलन