शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

६४ दिवस उपवासाने मुलीचा मृत्यू

By admin | Updated: October 9, 2016 00:22 IST

वडिलांना व्यवसायात यश मिळावे म्हणून ६४ दिवस उपवास ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. हैदराबादेत ही धक्कादायक घटना घडली. आराधना असे या मुलीचे नाव

हैदराबाद : वडिलांना व्यवसायात यश मिळावे म्हणून ६४ दिवस उपवास ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. हैदराबादेत ही धक्कादायक घटना घडली. आराधना असे या मुलीचे नाव असून, ती जैन समाजातील आहे. आराधना सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये ८ व्या इयत्तेत शिकत होती. वडील लक्ष्मीचंद सनसाडिया यांचे सराफा व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून निघावे, त्यांच्या व्यवसायाची भरभराट व्हावी यासाठी आराधना उपवास करीत होती. चेन्नईतील पुजाऱ्याच्या सांगण्यावरून आराधनाच्या आई-वडिलांनी तिला उपवास धरायला लावले होते. आराधनाचे १० आठवड्यांचे चातुर्मास उपवास ३ आॅक्टोबर रोजी पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाने त्याचे पारणे केले. या कार्यक्रमाला तेलंगणाचे एक मंत्री पद्म राव हे देखील उपस्थित होते. पारण्यानंतर लगेचच शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे आराधनाला रुग्णालयात नेण्यात आले. उपासमारीमुळे ती कोमात गेली होती. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. उपवासामुळे तिची आतडी सुकून गेली होती, तसेच दोन्ही किडन्यांचीही मोठी हानी झाली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. मुलाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेने या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी मुलीला चार महिने उपवास धरायला लावले, असे बाल हक्कुला संगम संस्थेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून जे कोणी या निर्दोष मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या संस्थेने केली आहे. (वृत्तसंस्था)पुजाऱ्याच्या सांगण्यावरून..!६४ दिवसांच्या उपवासानंतर १३ वर्षांच्या मुलीचा हैदराबादेत मृत्यूआराधनाने तिच्या कुटुंबाचा भाग्योदय व्हावा यासाठी चातुर्मासाचे उपवास धरले होते. एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून तिच्या आई-वडिलांनी तिला उपवास धरण्यास सांगितले होते.