शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

चिंताजनक! पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं एकट्या भारतात, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:15 IST

स्विस फर्म आयक्यूएअरनं (IQAir) जारी केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्टनुसार (World Air Quality Report) २०२१ मध्ये भारतातील वायुप्रदूषणाचा स्तर आणखी वाढला आहे.

नवी दिल्ली- 

स्विस फर्म आयक्यूएअरनं (IQAir) जारी केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्टनुसार (World Air Quality Report) २०२१ मध्ये भारतातील वायुप्रदूषणाचा स्तर आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत हवेची गुणवत्ता सुधारण्याचा ट्रेंड संपुष्टात आला आहे. प्राणघातक आणि सूक्ष्म PM2.5 प्रदूषकांमध्ये मोजलेले सरासरी वायू प्रदूषण 58.1 मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतका आहे. हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) हवेच्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्त्वापेक्षा १० पट अधिक आहे. जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांच्या यादीत 63 भारतातील शहरं आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक ठिकाणं हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आहेत. धक्कादायक बाब अशी की भारतातील कोणतंही शहर WHO च्या मानकांची पूर्तता करू शकलं नाही.

अहवालानुसार, उत्तर भारतातील परिस्थिती आणखी वाईट आहे. राजधानी दिल्ली ही सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीतील प्रदूषणात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथे वायू प्रदूषणाची पातळी डब्ल्यूएचओ सुरक्षा मर्यादेपेक्षा जवळजवळ 20 पट जास्त होती, वार्षिक सरासरी पीएम 2.5 96.4 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी आहे. तर सुरक्षित मर्यादा ५ इतकी आहे. दिल्लीच्या वायू प्रदूषणात जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर असल्याचं अहवालात म्हटलं आहे. मात्र, जगातील सर्वात प्रदूषित ठिकाण म्हणजे राजस्थानमधील भिवाडी. यानंतर दिल्लीच्या पूर्व सीमेवर उत्तर प्रदेशचे गाझियाबादचा नंबर लागतो. टॉप 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 10 भारतातील आहेत आणि बहुतेक शहरं राजधानीच्या आसपासची आहेत.

शिकागो विद्यापीठाने तयार केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा 'लाइफ इंडेक्स' सूचित करतो की दिल्ली आणि लखनौचे रहिवासी जर शहरानं WHO च्या मानकांनुसार हवेच्या गुणवत्तेची पातळी राखली तर त्यांच्या अपेक्षित आयुष्यात आणखी दहा वर्षांची भर घालू शकतात. 'IQAir'च्या सध्याच्या आकडेवारीवर टिप्पणी करताना, ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल म्हणाले की, हा अहवाल सरकार आणि कॉर्पोरेशनसाठी डोळे उघडणारा आहे. 'लोक धोकादायक प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं. शहरांच्या हवामानात PM-2.5 कणांच्या प्रचंड उपस्थितीसाठी वाहनांचं उत्सर्जन हे एक प्रमुख घटक आहे. केवळ तीन देशांनी ते पूर्ण केलं', असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये वाहनांमधून निघणारा धूर, कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक कचरा, स्वयंपाकासाठी केलं जाणारं ज्वलन आणि बांधकाम क्षेत्र यांचा समावेश होतो. खरंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, पहिल्यांदाच दिल्लीच्या आसपासचे अनेक मोठे ऊर्जा प्रकल्प तसेच अनेक उद्योग वायू प्रदूषणाच्या तीव्र पातळीमुळे बंद पडले होते. भारतासाठी या संकटाचा आर्थिक खर्च वार्षिक $150 अब्ज पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. हृदय आणि फुफ्फुसाचे आजार आणि इतर अनेक गंभीर परिणाम वायू प्रदुषणामुळे होतात. वायू प्रदूषणाशी संबंधित दरमिनिटामागे अंदाजे तीन मृत्यू होतात आणि ही आकडेवारी अतिशय वाईट आहे. 

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना