शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं एकट्या भारतात, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:15 IST

स्विस फर्म आयक्यूएअरनं (IQAir) जारी केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्टनुसार (World Air Quality Report) २०२१ मध्ये भारतातील वायुप्रदूषणाचा स्तर आणखी वाढला आहे.

नवी दिल्ली- 

स्विस फर्म आयक्यूएअरनं (IQAir) जारी केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्टनुसार (World Air Quality Report) २०२१ मध्ये भारतातील वायुप्रदूषणाचा स्तर आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत हवेची गुणवत्ता सुधारण्याचा ट्रेंड संपुष्टात आला आहे. प्राणघातक आणि सूक्ष्म PM2.5 प्रदूषकांमध्ये मोजलेले सरासरी वायू प्रदूषण 58.1 मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतका आहे. हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) हवेच्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्त्वापेक्षा १० पट अधिक आहे. जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांच्या यादीत 63 भारतातील शहरं आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक ठिकाणं हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आहेत. धक्कादायक बाब अशी की भारतातील कोणतंही शहर WHO च्या मानकांची पूर्तता करू शकलं नाही.

अहवालानुसार, उत्तर भारतातील परिस्थिती आणखी वाईट आहे. राजधानी दिल्ली ही सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीतील प्रदूषणात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथे वायू प्रदूषणाची पातळी डब्ल्यूएचओ सुरक्षा मर्यादेपेक्षा जवळजवळ 20 पट जास्त होती, वार्षिक सरासरी पीएम 2.5 96.4 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी आहे. तर सुरक्षित मर्यादा ५ इतकी आहे. दिल्लीच्या वायू प्रदूषणात जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर असल्याचं अहवालात म्हटलं आहे. मात्र, जगातील सर्वात प्रदूषित ठिकाण म्हणजे राजस्थानमधील भिवाडी. यानंतर दिल्लीच्या पूर्व सीमेवर उत्तर प्रदेशचे गाझियाबादचा नंबर लागतो. टॉप 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 10 भारतातील आहेत आणि बहुतेक शहरं राजधानीच्या आसपासची आहेत.

शिकागो विद्यापीठाने तयार केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा 'लाइफ इंडेक्स' सूचित करतो की दिल्ली आणि लखनौचे रहिवासी जर शहरानं WHO च्या मानकांनुसार हवेच्या गुणवत्तेची पातळी राखली तर त्यांच्या अपेक्षित आयुष्यात आणखी दहा वर्षांची भर घालू शकतात. 'IQAir'च्या सध्याच्या आकडेवारीवर टिप्पणी करताना, ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल म्हणाले की, हा अहवाल सरकार आणि कॉर्पोरेशनसाठी डोळे उघडणारा आहे. 'लोक धोकादायक प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं. शहरांच्या हवामानात PM-2.5 कणांच्या प्रचंड उपस्थितीसाठी वाहनांचं उत्सर्जन हे एक प्रमुख घटक आहे. केवळ तीन देशांनी ते पूर्ण केलं', असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये वाहनांमधून निघणारा धूर, कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक कचरा, स्वयंपाकासाठी केलं जाणारं ज्वलन आणि बांधकाम क्षेत्र यांचा समावेश होतो. खरंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, पहिल्यांदाच दिल्लीच्या आसपासचे अनेक मोठे ऊर्जा प्रकल्प तसेच अनेक उद्योग वायू प्रदूषणाच्या तीव्र पातळीमुळे बंद पडले होते. भारतासाठी या संकटाचा आर्थिक खर्च वार्षिक $150 अब्ज पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. हृदय आणि फुफ्फुसाचे आजार आणि इतर अनेक गंभीर परिणाम वायू प्रदुषणामुळे होतात. वायू प्रदूषणाशी संबंधित दरमिनिटामागे अंदाजे तीन मृत्यू होतात आणि ही आकडेवारी अतिशय वाईट आहे. 

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना