शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

६२ वर्षांची महिला शेतकरी ६ वर्षे कायदेशीर लढाई लढली, ५ आयएएस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 14:18 IST

Court News: हा खटला म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत नोकरशाहामंध्ये असलेली उदासिनता आणि घटनात्मक न्यायालयाच्या आदेशाबाबत त्यांच्याकडून जाणूनबुजून दाखवल्या जाणाऱ्या अज्ञानदर्शक भूमिकेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असा निकाल सुनावताना न्यायमूर्तींनी शेरा मारला. 

नवी दिल्ली - आंध्र प्रदेश हायकोर्टाने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निकाल सुनावताना राज्यातील चार आजी आणि एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा सुनावली. या सर्व अधिकाऱ्यांना एका ६२ वर्षीय महिला शेतकऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर ही शिक्षा सुनावली गेली आहे. ही महिला शेतकरी आपल्या हक्कांसाटी तब्बल सहा वर्षे कायदेशीर लढाई लढत होती. (A 62-year-old woman farmer fought a legal battle for six years and five IAS officers were convicted)

आंध्र प्रदेश हायकोर्टाने दोषी ठरवलेल्या आयएएस अधिकाऱ्यांमद्ये मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आणि एसपीएस नेल्लोर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी रेवु मुत्याला राजू, माजी जिल्हाधिकारी एमव्ही शेषगिरी बाबू, एसपीएस नेल्लोर जिल्हा कलेक्टर  केवीएन चक्रधर मुख्य वित्त सचिव शमशेर सिंह रावत आणि माजी आयएएस अधिकारी मनमोहन सिंह यांचा समावेश आहे.

मनमोहन सिंह यांना एक हजार रुपयांच्या दंडासह चार आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजू यांना दोन आठवड्यांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आङे. रावत यांना दोन हजार रुपये दंड आणि एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बाबू आणि चक्रधर यांच्यावर दोन दोन हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

हायकोर्टाचा हा आदेश एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील शेतकरी सविथ्रम्मा यांनी दाखल केलेल्या एका अवमान याचिकेवर निकाल देताना देण्यात आला आहे. २०१५ मध्ये महसूल अधिकाऱ्यांनी जमीन घेतली होती. मात्र नुकसान भरपाई दिली नव्हती. त्यानंतर सदर महिला शेतकऱ्याने या प्रकरणी लोकायुक्तांना एकदा आणि हायकोर्टामध्ये दोन वेळा आणि एक अवमानना याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांना यावर्षी मार्च महिन्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती.

सविथ्रम्मा हिचे पती तल्लापका व्यंकटय्या यांना एका पट्टेदार म्हणून ३ एकर जमीन देण्यात आली होती. याचा अर्थ त्यांनी जमिनीसाठी महसूल जमा करून थेट सरकारकडून जमीन घेतली होती. १९९८ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जमिनीचा ताबा सविथ्रम्मा यांना देण्यात आला होता. मात्र २०१५ मध्ये महसूल अधिकाऱ्यांनी ही जमीन काढून घेतली. तसेच कुठलीही नोटिस किंवा नुकसान भरपाई न देता राष्ट्रीय मानसिक दुर्बल संस्थेला उपलब्ध केली. त्याविरोधात सविथ्रम्मा यांनी तेव्हा लोकायुक्तांकडे तक्रार केली. तेव्हापासू याबाबत न्यायालयीन लढाई सुरू होती. 

दरम्यान, या खटल्याचा निकाल सुनावताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती बट्टू देवानंद यांनी हा खटला म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत नोकरशाहामंध्ये असलेली उदासिनता आणि घटनात्मक न्यायालयाच्या आदेशाबाबत त्यांच्याकडून जाणूनबुजून दाखवल्या जाणाऱ्या अज्ञानदर्शक भूमिकेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असा शेरा मारला. 

टॅग्स :Courtन्यायालयAndhra Pradeshआंध्र प्रदेशWomenमहिलाFarmerशेतकरी