शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

६२ वर्षांची महिला शेतकरी ६ वर्षे कायदेशीर लढाई लढली, ५ आयएएस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 14:18 IST

Court News: हा खटला म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत नोकरशाहामंध्ये असलेली उदासिनता आणि घटनात्मक न्यायालयाच्या आदेशाबाबत त्यांच्याकडून जाणूनबुजून दाखवल्या जाणाऱ्या अज्ञानदर्शक भूमिकेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असा निकाल सुनावताना न्यायमूर्तींनी शेरा मारला. 

नवी दिल्ली - आंध्र प्रदेश हायकोर्टाने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निकाल सुनावताना राज्यातील चार आजी आणि एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा सुनावली. या सर्व अधिकाऱ्यांना एका ६२ वर्षीय महिला शेतकऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर ही शिक्षा सुनावली गेली आहे. ही महिला शेतकरी आपल्या हक्कांसाटी तब्बल सहा वर्षे कायदेशीर लढाई लढत होती. (A 62-year-old woman farmer fought a legal battle for six years and five IAS officers were convicted)

आंध्र प्रदेश हायकोर्टाने दोषी ठरवलेल्या आयएएस अधिकाऱ्यांमद्ये मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आणि एसपीएस नेल्लोर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी रेवु मुत्याला राजू, माजी जिल्हाधिकारी एमव्ही शेषगिरी बाबू, एसपीएस नेल्लोर जिल्हा कलेक्टर  केवीएन चक्रधर मुख्य वित्त सचिव शमशेर सिंह रावत आणि माजी आयएएस अधिकारी मनमोहन सिंह यांचा समावेश आहे.

मनमोहन सिंह यांना एक हजार रुपयांच्या दंडासह चार आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजू यांना दोन आठवड्यांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आङे. रावत यांना दोन हजार रुपये दंड आणि एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बाबू आणि चक्रधर यांच्यावर दोन दोन हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

हायकोर्टाचा हा आदेश एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील शेतकरी सविथ्रम्मा यांनी दाखल केलेल्या एका अवमान याचिकेवर निकाल देताना देण्यात आला आहे. २०१५ मध्ये महसूल अधिकाऱ्यांनी जमीन घेतली होती. मात्र नुकसान भरपाई दिली नव्हती. त्यानंतर सदर महिला शेतकऱ्याने या प्रकरणी लोकायुक्तांना एकदा आणि हायकोर्टामध्ये दोन वेळा आणि एक अवमानना याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांना यावर्षी मार्च महिन्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती.

सविथ्रम्मा हिचे पती तल्लापका व्यंकटय्या यांना एका पट्टेदार म्हणून ३ एकर जमीन देण्यात आली होती. याचा अर्थ त्यांनी जमिनीसाठी महसूल जमा करून थेट सरकारकडून जमीन घेतली होती. १९९८ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जमिनीचा ताबा सविथ्रम्मा यांना देण्यात आला होता. मात्र २०१५ मध्ये महसूल अधिकाऱ्यांनी ही जमीन काढून घेतली. तसेच कुठलीही नोटिस किंवा नुकसान भरपाई न देता राष्ट्रीय मानसिक दुर्बल संस्थेला उपलब्ध केली. त्याविरोधात सविथ्रम्मा यांनी तेव्हा लोकायुक्तांकडे तक्रार केली. तेव्हापासू याबाबत न्यायालयीन लढाई सुरू होती. 

दरम्यान, या खटल्याचा निकाल सुनावताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती बट्टू देवानंद यांनी हा खटला म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत नोकरशाहामंध्ये असलेली उदासिनता आणि घटनात्मक न्यायालयाच्या आदेशाबाबत त्यांच्याकडून जाणूनबुजून दाखवल्या जाणाऱ्या अज्ञानदर्शक भूमिकेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असा शेरा मारला. 

टॅग्स :Courtन्यायालयAndhra Pradeshआंध्र प्रदेशWomenमहिलाFarmerशेतकरी