शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

यूपी, राजस्थानमध्ये वीज कोसळून 61 जणांचा मृत्यू, नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 9:12 AM

lightning : उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वीज पडून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाले आहेत.

लखनऊ/जयपूर : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) वीज कोसळून (Lightning)  जवळपास 61 जणांचा मृत्यू (Death Toll) झाला आहे. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वीज पडून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाले आहेत. 

या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रयागराजमध्ये वीज कोसळून सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू झाला आहे. कानपूर देहात आणि फतेहपूरमध्ये प्रत्यकी 5 मृत्यू झाले आहेत. कौशांबीमध्ये 4 लोकांचा मृत्यू,  फिरोजाबादमध्ये 3 लोकांचा मृत्यू, उन्नाव-हमीरपूर-सोनभद्रात प्रत्येकी 2 मृत्यू, कानपूर नगर-प्रतापगड-हरदोई-मिर्जापूरमध्ये प्रत्येक एक मृत्यू झाला आहे. 

याशिवाय, 22 लोक जखमी झाले आहेत, तर 200 हून अधिक जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मदत करण्याचे निर्देशन दिले आहेत. दरम्यान, रविवारी संध्याकाळी उशिरा उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान अधिक खराब झाल्याची देण्यात आली होती. पावसाबरोबरच अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या.

दुसरीकडे, राजस्थानमध्ये वीज कोसळल्याने जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला. सरकारी आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये वीज कोसळल्याने मृतांचा आकडा रविवारी 20 वर पोहोचला आहे. यापैकी जयपूरमध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटामध्ये 4, झालावाडमध्ये 1 आणि बारानमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. 

राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यापैकी 4 लाख आपत्कालीन मदत निधीतून तर १ लाख मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येणार आहेत. दरम्यान, वीज कोसळल्याने ज्यांनी आपला जीव गमावला त्यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशRajasthanराजस्थान