शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आसाम, बिहार अन् कर्नाटकात पूर्वमाेसमी पावसाचे 57 बळी; अतिवृ़ष्टीने हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 09:14 IST

अनेक भागांमध्ये पूर्वमाेसमी हालचाली सुरू झाल्या आहेत.

गुवाहाटी/बंगळुरू/थिरुवनंतपुरम : मान्सूनच्या आगमनापूर्वीच देशातील काही राज्यांमध्ये वादळ आणि अतिवृष्टीने हाहाकार माजविला आहे. आसाम, बिहार आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये पूर आणि वीज काेसळल्यामुळे आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दाेन दिवस या राज्यांसह देशातील अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने चिंतेत भर पडली आहे. 

अनेक भागांमध्ये पूर्वमाेसमी हालचाली सुरू झाल्या आहेत.  ईशान्येकडील आसाम आणि मेघालयमध्ये पूरस्थिती सर्वात गंभीर आहे. ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांना भीषण पूर आला असून शेकडाे गावे पाण्यात बुडाली आहेत. आसाममध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मेघालयमध्ये हा आकडा १४ वर पाेहाेचला आहे.  सुमारे ७ लाखांहून अधिक लाेक पूर आणि अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत. एकट्या नागाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. आसामच्या जमुनामुख जिल्ह्यातील दाेन गावांमध्ये राहणाऱ्या ५०० हून अधिक लाेकांना चक्क रेल्वे रुळांवर तात्पुरता आश्रय घेण्याची वेळ आली.  

केरळमध्ये धरणांचे दरवाजे उघडले

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे इडुक्की जिल्ह्यातील कल्लारकुट्टी आणि पंबला या धरणांचे दरवाजे उघडले आहेत. हवामान  खात्याने राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये २२ मेपर्यंत ‘यलाे अलर्ट’ जारी केला आहे.

बिहारमध्ये ३३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वादळी पाऊस आणि वीज पडल्यामुळे १६ जिल्ह्यांमधील ३३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी भागलपूर येथे सर्वाधिक ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारमध्ये दाेन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये जनजीवन विस्कळीत

कर्नाटकमध्ये बंगळुरूसह दक्षिणेकडील भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पुरामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी घरे आणि वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे किनारपट्टीजवळील जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाचा धाेका वाढला आहे.

टॅग्स :RainपाऊसAssamआसामDeathमृत्यूcycloneचक्रीवादळ