शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

आसाम, बिहार अन् कर्नाटकात पूर्वमाेसमी पावसाचे 57 बळी; अतिवृ़ष्टीने हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 09:14 IST

अनेक भागांमध्ये पूर्वमाेसमी हालचाली सुरू झाल्या आहेत.

गुवाहाटी/बंगळुरू/थिरुवनंतपुरम : मान्सूनच्या आगमनापूर्वीच देशातील काही राज्यांमध्ये वादळ आणि अतिवृष्टीने हाहाकार माजविला आहे. आसाम, बिहार आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये पूर आणि वीज काेसळल्यामुळे आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दाेन दिवस या राज्यांसह देशातील अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने चिंतेत भर पडली आहे. 

अनेक भागांमध्ये पूर्वमाेसमी हालचाली सुरू झाल्या आहेत.  ईशान्येकडील आसाम आणि मेघालयमध्ये पूरस्थिती सर्वात गंभीर आहे. ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांना भीषण पूर आला असून शेकडाे गावे पाण्यात बुडाली आहेत. आसाममध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मेघालयमध्ये हा आकडा १४ वर पाेहाेचला आहे.  सुमारे ७ लाखांहून अधिक लाेक पूर आणि अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत. एकट्या नागाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. आसामच्या जमुनामुख जिल्ह्यातील दाेन गावांमध्ये राहणाऱ्या ५०० हून अधिक लाेकांना चक्क रेल्वे रुळांवर तात्पुरता आश्रय घेण्याची वेळ आली.  

केरळमध्ये धरणांचे दरवाजे उघडले

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे इडुक्की जिल्ह्यातील कल्लारकुट्टी आणि पंबला या धरणांचे दरवाजे उघडले आहेत. हवामान  खात्याने राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये २२ मेपर्यंत ‘यलाे अलर्ट’ जारी केला आहे.

बिहारमध्ये ३३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वादळी पाऊस आणि वीज पडल्यामुळे १६ जिल्ह्यांमधील ३३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी भागलपूर येथे सर्वाधिक ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारमध्ये दाेन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये जनजीवन विस्कळीत

कर्नाटकमध्ये बंगळुरूसह दक्षिणेकडील भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पुरामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी घरे आणि वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे किनारपट्टीजवळील जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाचा धाेका वाढला आहे.

टॅग्स :RainपाऊसAssamआसामDeathमृत्यूcycloneचक्रीवादळ