शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आसाम, बिहार अन् कर्नाटकात पूर्वमाेसमी पावसाचे 57 बळी; अतिवृ़ष्टीने हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 09:14 IST

अनेक भागांमध्ये पूर्वमाेसमी हालचाली सुरू झाल्या आहेत.

गुवाहाटी/बंगळुरू/थिरुवनंतपुरम : मान्सूनच्या आगमनापूर्वीच देशातील काही राज्यांमध्ये वादळ आणि अतिवृष्टीने हाहाकार माजविला आहे. आसाम, बिहार आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये पूर आणि वीज काेसळल्यामुळे आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दाेन दिवस या राज्यांसह देशातील अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने चिंतेत भर पडली आहे. 

अनेक भागांमध्ये पूर्वमाेसमी हालचाली सुरू झाल्या आहेत.  ईशान्येकडील आसाम आणि मेघालयमध्ये पूरस्थिती सर्वात गंभीर आहे. ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांना भीषण पूर आला असून शेकडाे गावे पाण्यात बुडाली आहेत. आसाममध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मेघालयमध्ये हा आकडा १४ वर पाेहाेचला आहे.  सुमारे ७ लाखांहून अधिक लाेक पूर आणि अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत. एकट्या नागाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. आसामच्या जमुनामुख जिल्ह्यातील दाेन गावांमध्ये राहणाऱ्या ५०० हून अधिक लाेकांना चक्क रेल्वे रुळांवर तात्पुरता आश्रय घेण्याची वेळ आली.  

केरळमध्ये धरणांचे दरवाजे उघडले

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे इडुक्की जिल्ह्यातील कल्लारकुट्टी आणि पंबला या धरणांचे दरवाजे उघडले आहेत. हवामान  खात्याने राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये २२ मेपर्यंत ‘यलाे अलर्ट’ जारी केला आहे.

बिहारमध्ये ३३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वादळी पाऊस आणि वीज पडल्यामुळे १६ जिल्ह्यांमधील ३३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी भागलपूर येथे सर्वाधिक ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारमध्ये दाेन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये जनजीवन विस्कळीत

कर्नाटकमध्ये बंगळुरूसह दक्षिणेकडील भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पुरामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी घरे आणि वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे किनारपट्टीजवळील जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाचा धाेका वाढला आहे.

टॅग्स :RainपाऊसAssamआसामDeathमृत्यूcycloneचक्रीवादळ