शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

देवदर्शनाहून परतताना कार आणि बसचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:17 IST

Rajasthan Accident: राजस्थानमधील करौली जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते.

राजस्थानमधील करौली जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते. अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी येत मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवले.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार सलेमपूर-कुडगाव मार्गावर हा अपघात झाला. इंदूर येथील नयन देशमुख हे आपल्या कुटुंबीयांसह कैलादेवी मंदिरात दर्शन घेऊन येत होते. ते कुडगाव रोडवर पोहोचले तेव्हा कार आणि बसमध्ये भीषण टक्कर झाली.

करौलीचे पोलिस अधीक्षक ब्रजेश ज्योती उपाध्याय यांनी सांगितले की, कारमधून प्रवास करत असलेले लोक दर्शन घेऊन गंगापूर सिटीच्या दिशेने जात होते. त्यादरम्यान कुडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सलेमपूर-कुडगाव मार्गावर हा अपघात झाला. बस आणि कारमधील टक्कर एवढी जोरदार होती की त्यात कारचा चेंदामेंदा झाला. तसेच कारचा पुढील भाग बसखाली जाऊन अडकला.

या अपघातात कारमध्ये स्वार असलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नयन देशमुख (६०), नयन देशमुख यांचा मुलगा खूश देशमुख (२२), मुलगी मानस्वी देशमुख (२५), बहीण प्रीती भट्ट आणि नातेवाईक अनिता यांचा समावेश आहे.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानFamilyपरिवार