शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

देशात ४५ लाख टन साखर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 13:13 IST

राज्यात अवघे साडेसात लाख टन साखरेचे उत्पादन

ठळक मुद्दे गेल्यावर्षीच्या तुलनेत ते ३० टक्केच असल्याची माहिती यंदाच्या साखर हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के साखर उत्पादन कमी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाला पुराचा मोठ्या प्रमाणावर बसला फटका साखर कारखाने करणार १६३ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा

पुणे : देशातील ४०६ साखर कारखाने १५ डिसेंबर अखेरीस सुरू झाले असून, ४५.८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली असून, एकूण उत्पादनापैकी जवळपास निम्मे उत्पादन येथे झाले आहे. महाराष्ट्रात अवघे ७.६६ लाख टन साखर उत्पादन झाले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत ते ३० टक्केच असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली.यंदाच्या साखर हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के साखर उत्पादन कमी झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात देशभरातील ४७३ साखर कारखान्यांची धुराडी पेटली होती. त्यातून ७०.५४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशातील ११९ साखर कारखान्यांनी २१.२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्यावर्षी याच काळामध्ये येथील ११६ कारखान्यांनी १८.९४ लाख टन साखर उत्पादित केली होती. यावर्षी २.३१ लाख टन साखर अधिक उत्पादित केली आहे. देशात साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेरीस ७.६६ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्यावर्षी याच काळात राज्यातील १७८ कारखाने सुरू होते. त्यांनी २९ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कर्नाटक राज्यातही १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.३२ लाख टनांनी साखर उत्पादन कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाला पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम १ महिना, तर कर्नाटकातील गाळप हंगाम एका आठवड्याने उशिरा सुरू झाला. पावसामुळे बाधित झालेल्या उसाचा साखर उतारादेखील कमी असल्याने, उत्पादनात घट नोंदविण्यात आली. गुजरातमध्ये १.५२ लाख टन, आंध्रप्रदेश, तेलंगणामधे ०.३०, तमिळनाडूत ०.७३, बिहार १.३५, पंजाब ०.७५, हरयाणा ०.६५ आणि मध्य प्रदेशमध्ये ०.३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या राज्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट नोंदविण्यात आली आहे. ........साखर कारखाने करणार १६३ कोटी लिटर इथेनॉल पुरवठादेशातील साखर कारखाने, डिस्टिलरी युनिट डिसेंबर २०१९ ते नोव्हेबंर २०२० या कालावधीत १६३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करणार आहेत. त्यातील १०.३८ कोटी लिटर इथेनॉल उसाच्या रसापासून आणि ६२.५८ कोटी लिटर बी हेवी मोलॅसिस पासून बनविण्यात येणार आहे. तर, ८६.३९ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती सी हेवी मोलॉॅसिसमधून आणि ३.७८ कोटी लिटर खराब अन्नधान्यातून होणार आहे. म्हणजेच यातील ७३ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती थेट उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसमधून होईल. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार