शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

देशात ४५ लाख टन साखर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 13:13 IST

राज्यात अवघे साडेसात लाख टन साखरेचे उत्पादन

ठळक मुद्दे गेल्यावर्षीच्या तुलनेत ते ३० टक्केच असल्याची माहिती यंदाच्या साखर हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के साखर उत्पादन कमी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाला पुराचा मोठ्या प्रमाणावर बसला फटका साखर कारखाने करणार १६३ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा

पुणे : देशातील ४०६ साखर कारखाने १५ डिसेंबर अखेरीस सुरू झाले असून, ४५.८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली असून, एकूण उत्पादनापैकी जवळपास निम्मे उत्पादन येथे झाले आहे. महाराष्ट्रात अवघे ७.६६ लाख टन साखर उत्पादन झाले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत ते ३० टक्केच असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली.यंदाच्या साखर हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के साखर उत्पादन कमी झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात देशभरातील ४७३ साखर कारखान्यांची धुराडी पेटली होती. त्यातून ७०.५४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशातील ११९ साखर कारखान्यांनी २१.२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्यावर्षी याच काळामध्ये येथील ११६ कारखान्यांनी १८.९४ लाख टन साखर उत्पादित केली होती. यावर्षी २.३१ लाख टन साखर अधिक उत्पादित केली आहे. देशात साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेरीस ७.६६ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्यावर्षी याच काळात राज्यातील १७८ कारखाने सुरू होते. त्यांनी २९ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कर्नाटक राज्यातही १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.३२ लाख टनांनी साखर उत्पादन कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाला पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम १ महिना, तर कर्नाटकातील गाळप हंगाम एका आठवड्याने उशिरा सुरू झाला. पावसामुळे बाधित झालेल्या उसाचा साखर उतारादेखील कमी असल्याने, उत्पादनात घट नोंदविण्यात आली. गुजरातमध्ये १.५२ लाख टन, आंध्रप्रदेश, तेलंगणामधे ०.३०, तमिळनाडूत ०.७३, बिहार १.३५, पंजाब ०.७५, हरयाणा ०.६५ आणि मध्य प्रदेशमध्ये ०.३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या राज्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट नोंदविण्यात आली आहे. ........साखर कारखाने करणार १६३ कोटी लिटर इथेनॉल पुरवठादेशातील साखर कारखाने, डिस्टिलरी युनिट डिसेंबर २०१९ ते नोव्हेबंर २०२० या कालावधीत १६३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करणार आहेत. त्यातील १०.३८ कोटी लिटर इथेनॉल उसाच्या रसापासून आणि ६२.५८ कोटी लिटर बी हेवी मोलॅसिस पासून बनविण्यात येणार आहे. तर, ८६.३९ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती सी हेवी मोलॉॅसिसमधून आणि ३.७८ कोटी लिटर खराब अन्नधान्यातून होणार आहे. म्हणजेच यातील ७३ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती थेट उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसमधून होईल. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार