शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 17:16 IST

काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे.

बंगळुरू - कर्नाटकमध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रसने एकहाती सत्ता मिळवत कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुरू असलेली स्पर्धा अखेर दिल्लीतून आदेश आल्यानंतर संपली. त्यामुळे, सिद्धरमैय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले आणि डीके शिवकुमार वेटींगवर राहिले. आता, काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचा दावा भाजपा आमदाराने केला आहे. देशातील काही राज्यात सत्ताधारी पक्षाला सुरुंग लावत भाजपने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे, कर्नाटकमध्येही भाजपाचाच तोच प्रयत्न आहे का, असा प्रश्न आमदाराच्या या दाव्यानंतर उपस्थित होत आहे. 

काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. भाजपा नेता बसनगौडा आर पाटील यांनी म्हटले की, काँग्रेसने वरिष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांना महत्त्व दिले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, हरिप्रसाद यांनी सिद्धरमैय्या यांच्याबाबतीत अनेक गोष्टी बोालून दाखवल्या आहेत. त्यामुळेच, जानेवारी महिन्यानंतर येथील सरकार कोसळणार, असा दावा बसनगौडा यांनी केलाय. 

काँग्रेसचे ४४ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही बसनगौडा आर. पाटील यांनी केला आहे. आता, आम्हीच सत्तेत येत आहोत, मग विरोधी पक्ष निवडीचा त्रास कशाला घ्यायचा, असेही पाटील यांनी म्हटले. 

दरम्यान, हैदराबाद येथे आयोजित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बीके हरिप्रसाद, मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे तिन्ही नेते होते. मात्र, येथे हरिप्रसाद यांना बोलण्याची संधी दिली नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही येथे व्यासपीठावर भाषण केले. तर, हरिप्रसाद यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे, ते नाराज असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा