शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

४४% भारतीयांना नोकरीची चिंता!; १७ लाख नवीन बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 1:35 AM

दरवर्षी २ कोटी रोजगारांचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, तेवढ्या नोकऱ्या देशात तयार झालेल्या नाहीत. त्याउलट ४४ टक्के भारतीयांना नोकरीची चिंता आहे. ‘आयपीएसओएस’ संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

मुंबई : दरवर्षी २ कोटी रोजगारांचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, तेवढ्या नोकऱ्या देशात तयार झालेल्या नाहीत. त्याउलट ४४ टक्के भारतीयांना नोकरीची चिंता आहे. ‘आयपीएसओएस’ संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.संस्थेच्या अहवालानुसार, दरवर्षी लाखो नवीन नोकºया तयार होत असल्याचे बोलले जात आहे. तसे असले, तरी वास्तवात बेरोजगारी अधिक प्रमाणात वाढत आहे. देशातील नोकºया निर्मितीचा नेमका सर्वसमावेशक आकडा काढणे अशक्य आहे, पण स्थिर किंवा समाधानकारक नोकरीबाबत देशातील युवकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, हे नक्की. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेनुसार (ईपीएफओ) आॅगस्ट महिन्यात देशात ९ लाख ५१ हजार नवीन नोकºया तयार झाल्या. रोजगारनिर्मितीचा हा ११ महिन्यांचा उच्चांक होता. यामुळे सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान देशातील नवीन नोकºयांचा आकडा ६१ लाख ८१ हजारावर गेला.दुसरीकडे, भारतीय अर्थव्यवस्था निरीक्षण केंद्राने (सीएमआयई) मात्र नोव्हेंबर२०१७ पासून देशातील नोकºयांचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान जवळपास १७ लाख नवीन बेरोजगार तयार झाले आहेत, असा दावा सीएमआयईने केला आहे.प्रमाण १ टक्काचअझीझ प्रेमजी विद्यापीठाचा अहवालसुद्धा नोकºयांसंबंधी निरुत्साह दर्शविणारा आहे. मागील काही वर्षांत आर्थिक विकास दर ६ ते ७ टक्के आहे, पण त्या तुलनेत दरवर्षी तयार होणाºया नवीन नोकºयांचे प्रमाण १ टक्का आहे, असे विद्यापीठाने अहवालात नमूद केले आहे. देशात नेमक्या किती नोकºया तयार झाल्या, याबाबत संभ्रम आहे, पण विविध अभ्यास अहवालांनुसार रोजगाराचे चित्र फारसे समाधानकारक नाही, हे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :jobनोकरी