शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

११ मुख्यमंत्र्यांसह ३९९ नेत्यांनी बदलला पक्ष; २०१४ पासून भाजपाचा काँग्रेसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 17:20 IST

अलीकडेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला. 

नवी दिल्ली - निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक पक्ष एकमेकांना चीतपट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला देशात नवी उभारी मिळाली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत ३९९ दिग्गज काँग्रेस नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यात ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. २४ मार्चला हरियाणातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नवीन जिंदाल यांनी काँग्रेसला रामराम केला. 

नवीन जिंदाल हे भाजपात येताच त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी घोषित केली. हिमाचल प्रदेशमध्येही भाजपाने ६ बंडखोर नेत्यांना पक्षात घेतले. २०१४ ते २०२१ या काळात सर्वात जुन्या काँग्रेस पक्षातून तब्बल ३९९ दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला. त्यात १७७ खासदार आणि आमदारांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि किमान २२ आमदारांनी २०२० मध्ये भाजपात सहभागी होण्याचा निर्णय घेत काँग्रेस पक्ष सोडला. 

भाजपानं शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आणि मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पाडले. त्याचवर्षी सुरेश पचौरी यांनी अनेक माजी आमदार, खासदारांसह पक्ष सोडला. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे सहकारी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. अलीकडेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला. 

उत्तर प्रदेशात माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदंबिका पाल आणि रिता बुहुगुणा जोशी, रवी किशन, अमरपाल त्यागी, धीरेंद्र सिंह यांनी २०१४, २०१६, २०१७ या काळात पक्ष सोडला. २०२१ मध्ये जितिन प्रसाद आणि २२ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला. २०२२ मध्ये आरपीएन सिंह यांनी काँग्रेससोबतचे ३ दशकाचे जुने संबंध तोडले. कर्नाटकात माजी मुख्यमंत्री एसएस कृष्णा यांनीही ५० वर्षाचे काँग्रेससोबतचे संबंध संपवले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही भाजपात प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. भाजपाने यंदा अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात पक्षांतरेही वाढली आहेत. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस