शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:31 IST

National Highway News: रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असतानाही राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नुकतेच फटकारले आहे.

नवी दिल्ली - रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असतानाही राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नुकतेच फटकारले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेले अपघात आणि टोल नाक्यांवरील वादामुळे चिंता निर्माण झाली असून, यावर कोर्टाने कारवाईची मागणी केली आहे. 

अर्थ मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या २०२०-२४ च्या अपघात आणि नुकसानीवरील अहवालानुसार, पाच वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांवर २.५ लाख अपघात झाले. यात ८०,००० लोकांचा मृत्यू झाला आणि २.३ लाख लोक जखमी झाले. २०२४ मध्ये, ४८,००० अपघातांमध्ये १७,२०० मृत्यूंची नोंद झाली. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, भारतातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीतून सुमारे ८५,००० कोटी रुपये कमावले गेले. तरीही देशातील १.४६ लाख किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांपैकी २०% (२९,२०० किमी) राष्ट्रीय महामार्ग ८०-१०० किमी/ताशी वेगाने प्रवास करण्यासाठी असुरक्षित आहेत आणि तेही विशेषतः खराब रस्ते आणि अरुंद वळणांमुळे. 

टोल नाक्यांवर हाणामारी२०२०-२४ मध्ये, राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावर ४,५०० मारहाणीच्या घटना घडल्या. यात उत्तर प्रदेश (१,२००), राजस्थान (९००) आणि हरयाणा (८००) यांचासमावेश आहे.  एकूण ४,५०० प्रकरणांपैकी फक्त १,८०० प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आणि १,२०० लोकांवर कारवाई (दंड किंवा अटक) करण्यात आली, असे अहवालात स्पष्ट होते.

अपघातांची कारणेरस्ते वाहतूक मंत्रालय आणि आयआयटी दिल्ली यांनी २०२४ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ७५.२% अपघात अतिवेगाने, २.५% दारू पिऊन गाडी चालवल्याने आणि १०% तांत्रिक बिघाडांमुळे (खड्डे, खराब सिग्नल, तुटलेले डिव्हायडर) झाले आहेत. २.५ लाख अपघात गेल्या ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर झाले. यात ८० हजार मृत्यू, २.३ लाख जण गंभीर जखमी झाले.

टॅग्स :highwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकPotholeखड्डेtollplazaटोलनाका