शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:22 IST

Sanjay Raut on Operation Sindoor in Rajya Sabha: खासदार संजय राऊत यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून सरकारला घेरले. पंडित नेहरू, डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sanjay Raut Speech on Operation Sindoor: "पहलगाममध्ये २६ लोकांची हत्या झाली. कशी झाली? आतापर्यंत सरकार सांगू शकलेले नाही", असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं. पंडित नेहरू, डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत राऊतांनी भाजपला टोला लगावला आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. या चर्चेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "पूर्ण काश्मीर गृह मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे. ३७० हटवल्यानंतर काश्मीरला केंद्र शासित प्रदेश करण्यात आले. तिथले पोलीस गृह मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करते. संपूर्ण काश्मिरमध्ये आर्म्ड फोर्सेस कायदा लागू केला आहे." 

"तिथले राज्यपालही तुमचे आहेत. कणखर माणूस आहे, तरीही हल्ला झाला आणि हल्लेखोर निघून गेले. राज्यपालांनीही त्यांची चूक मान्य केली आहे. सुरक्षेत चूक झाली आहे. जर सुरक्षेमध्ये चूक झाली आहे. २६ लोक मारले गेले आहेत. २६ आई बहि‍णींचं कुंकू पुसलं गेलं आहे. मग त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि राजीनामा कोण देणार?", असा सवाल संजय राऊत यांनी केला. 

केंद्र सरकारला राऊतांचा टोला

याच मुद्द्यावर पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "पंडित नेहरू देणार का? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देणार की, जेडी व्हान्स देणार का? कोण देणार?", असा टोला लगावत राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

"देशाच्या गृह मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, ती त्यांची जबाबादारी आहे. या देशात २४ तासांत उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो, कारण ते तुमचं म्हणणं ऐकत नाहीत; पण २६ लोकांची हत्या झाली, पण कुणाचा राजीनामा नाही. कुणाची माफी नाही. ही या देशाची स्थिती आहे", अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका

"आपले पंतप्रधान स्वतःला ईश्वराचे अवतार मानतात. त्यांचे भक्त त्यांना ईश्वराचा अवतार मानतात. पंतप्रधानांचं म्हणणं आहे की, मला वेळेआधीच घटना कळतात. ही माझ्यावर ईश्वराची असलेली कृपा आहे. मग दहशतवादी पहलगाममध्ये लोकांना मारणार आहेत, हे त्यांना का कळलं नाही?", असा सवाल संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहOperation Sindoorऑपरेशन सिंदूरRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदी