शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

२.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:18 AM

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत २.६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपयांप्रमाणे ५,२१५ कोटी रुपये जमा केले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत २.६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपयांप्रमाणे ५,२१५ कोटी रुपये जमा केले आहेत. ही योजना गेल्या महिन्यात संसदेत सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ७५ हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार दोन हेक्टर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना एका वर्षांत सहा हजार रुपये तीन हप्त्यांत विभागून दिले जातील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने अर्थसंकल्पात २० हजार कोटी रुपये या योजनेत मार्च २०१९ अखेर प्रत्येक शेतकºयाला दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी राखून ठेवले होते.उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेला राष्ट्रीय पातळीवर औपचारिक प्रारंभ गेल्या २४ फेब्रुवारी रोजी झाला होता. त्या दिवशी १.०१ कोटी शेतकºयांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला.‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २.६ कोटी छोट्या आणि सीमांत शेतकºयांच्या बँक खात्यात एकूण ५ हजार २१५ कोटी रूपये योजना जाहीर झाल्यापासून ३७ दिवसांत थेट जमा केले गेले, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी टिष्ट्वटरद्वारे सांगितले. अगदी छोट्या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येतील लाभार्थींना अशी रक्कम दिली गेली अशी ही पहिलीच योजना असेल, असेही पीएमओने म्हटले.गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले होते की उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्याने प्रधान मंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. सात मार्चपर्यंत उत्तर प्रदेशातील ७४.७१ लाख शेतकºयांना पहिला हप्ता मिळाला तर आंध्र प्रदेशातील ३२.१५ लाख शेतकरी याच योजनेचे लाभार्थी ठरले.कोणत्या राज्यात किती आहेत लाभार्थी?गुजरातमधील २५.५८ लाख, ११.५५ लाख शेतकरी महाराष्ट्रातील, तेलंगणातील १४.४१ लाख शेतकरी आणि तमिळनाडूतील १४.०१ लाख शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरले. इतर राज्यांतील लाभार्थी शेतकºयांची संख्या अशी : हरियाना (८.३४ लाख), आसाम (८.०९ लाख) आणि ओडिशा (८.०७ लाख). केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी पात्र ठरवलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यांत केंद्र सरकार थेट हे पैसे जमा करीत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजना