शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:11 IST

उत्तर प्रदेशातील योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कठोर पावले उचलत आहे.

UP Crime: उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून राज्यातील गुन्हेगारांविरोधात यूपी पोलिसांची तीव्र कारवाई सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, गुन्हेगारीबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत गुन्हेगार/गुन्हेगारांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई केली जात आहे. २०१७ पासून पोलिसांनी २३८ गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे, तर ९ हजारांहून अधिक गुन्हेगार गोळीबारात जखमी झाले आहेत. 

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३० हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक करुन तुरुंगात पाठवले आहे. तर, ९,४६७ गुन्हेगारांच्या पायाला गोळ्या लागल्या. सर्वाधिक कारवाई मेरठ झोनमध्ये झाली. 

योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या आठ वर्षांत यूपी पोलिस गुन्हेगारी आणि गुन्हेगारांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत सतत कारवाई करत आहेत. २०१७ पासून पोलिसांनी राज्यात ३० हजारांहून अधिक गुन्हेगारांना चकमकीनंतर अटक केली आहे, तर ९ हजारांहून अधिक गुन्हेगारांना चकमकीदरम्यान पायात गोळी लागली आहे. मेरठ झोनमध्ये सर्वाधिक ७९६९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली, तर २९११ जखमी झाले.

उत्तर प्रदेशचे डीजीपी राजीव कृष्णा म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार गुन्हेगारांवर सतत कारवाई केली जात आहे. गेल्या आठ वर्षांत, गुन्हेगारांना पकडण्यासाठी यूपी पोलिसांनी १४,९७३ कारवाई केल्या. या दरम्यान, ३०,६९४ गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ९,४६७ गुन्हेगारांना पायात गोळी लागली, तर २३८ गुन्हेगार मारले गेले. राज्यातील सर्वाधिक कारवाई पश्चिमेकडील मेरठ झोनमध्ये करण्यात आली. येथे पोलिसांनी ७,९६९ गुन्हेगारांना अटक केली तर २,९११ जखमी झाले. त्याचप्रमाणे, आग्रा झोनमध्ये ५,५२९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली, तर ७४१ जखमी झाले. तर बरेली झोनमध्ये ४,३८३ गुन्हेगारांना पकडण्यात आले आणि ९२१ जखमी झाले. याशिवाय वाराणसी झोनमध्ये २०२९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आणि ६२० जखमी झाले.

एकूणच, उत्तर प्रदेशात सत्ता हाती घेताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पहिले ध्येय राज्यात कायद्याचे राज्य स्थापित करणे आणि गुन्हेगारांचा नाश करणे हे राहिले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस