शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:22 IST

India-Pakistan Border: केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या भागांमध्ये रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सीमेलगतच्या भागात दोन हजार २८० किमी लांबीचे रस्ते बांधण्याच्या कामाच्या प्रस्तावाला मान्यता दिले आहे.

पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा ही केंद्र सरकार आणि संरक्षण दलांसाठी नेहमीच चिंतेची बाब ठरलेली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी सातत्याने काम केलं जात आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या भागांमध्ये रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सीमेलगतच्या भागात दोन हजार २८० किमी लांबीचे रस्ते बांधण्याच्या कामाच्या प्रस्तावाला मान्यता दिले आहे. सामरिक आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी मोदी सरकारने ४ हजार ४०० कोटींहून अधिकच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या परिसरामध्ये कुठल्याही हवामानामध्ये कार्यरत राहतील अशा रस्त्यांची कमतरता अनेक दशकांपासून भासत आहे. सीमेलगत असलेल्या भागांमध्ये जागतिक दर्जाचे रस्ते असल्याने दळणवळण सुलभ होणार आहे. तसेच आपातकालीन परिस्थितीमध्ये तिथे तत्काळ पोहोचणं सोपं होणार आहे. तसेच आवश्यक वस्तू तातडीने पोहोचवणेही सोपे जाणार आहे.

सीमेलगतच्या भागांमध्ये रस्त्यांची आवश्यकता विचारात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सीमेलगतच्या भागामध्ये २ हजार २८० किमी लांबीच्या रस्त्यांची बांधणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४ हजार ४०६ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या योजनेच्या माध्यमातून राजस्थान, पंजाब या राज्यांना लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेलगच्या भागातील रस्त्यांची व्यवस्था नीट केली जाईल. एवढंच नाही तर यामुळे या सीमावर्ती भागाची देशाच्या इतर भागांशी असलेली कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानCentral Governmentकेंद्र सरकार