शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:22 IST

India-Pakistan Border: केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या भागांमध्ये रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सीमेलगतच्या भागात दोन हजार २८० किमी लांबीचे रस्ते बांधण्याच्या कामाच्या प्रस्तावाला मान्यता दिले आहे.

पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा ही केंद्र सरकार आणि संरक्षण दलांसाठी नेहमीच चिंतेची बाब ठरलेली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी सातत्याने काम केलं जात आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या भागांमध्ये रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सीमेलगतच्या भागात दोन हजार २८० किमी लांबीचे रस्ते बांधण्याच्या कामाच्या प्रस्तावाला मान्यता दिले आहे. सामरिक आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी मोदी सरकारने ४ हजार ४०० कोटींहून अधिकच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या परिसरामध्ये कुठल्याही हवामानामध्ये कार्यरत राहतील अशा रस्त्यांची कमतरता अनेक दशकांपासून भासत आहे. सीमेलगत असलेल्या भागांमध्ये जागतिक दर्जाचे रस्ते असल्याने दळणवळण सुलभ होणार आहे. तसेच आपातकालीन परिस्थितीमध्ये तिथे तत्काळ पोहोचणं सोपं होणार आहे. तसेच आवश्यक वस्तू तातडीने पोहोचवणेही सोपे जाणार आहे.

सीमेलगतच्या भागांमध्ये रस्त्यांची आवश्यकता विचारात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सीमेलगतच्या भागामध्ये २ हजार २८० किमी लांबीच्या रस्त्यांची बांधणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४ हजार ४०६ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या योजनेच्या माध्यमातून राजस्थान, पंजाब या राज्यांना लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेलगच्या भागातील रस्त्यांची व्यवस्था नीट केली जाईल. एवढंच नाही तर यामुळे या सीमावर्ती भागाची देशाच्या इतर भागांशी असलेली कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानCentral Governmentकेंद्र सरकार