शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:50 IST

मुरादाबादमध्ये अशा २२ महिला आढळल्या आहेत, ज्यांचे राष्ट्रीयत्व अजूनही पाकिस्तानी आहे, परंतु त्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत.  

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयांमध्ये पाकिस्तानसोबतच्या राजनैतिक आणि व्यावसायिक संबंधांवर पुनर्विचार करणे, भारतात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि त्यांना देशातून परत पाठवणे, देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याची प्रक्रिया जलद करणे यांचा समावेश आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परत पाठवण्याच्या कारवाईदरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादाबादमध्ये अशा २२ महिला आढळल्या आहेत, ज्यांचे राष्ट्रीयत्व अजूनही पाकिस्तानी आहे, परंतु त्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत.  

इतकंच नाही तर, या सर्व महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न केले आहे आणि त्या इथेच राहत आहेत. या महिलांना एकूण ९५ मुले आहेत, त्यापैकी अनेकजण आता प्रौढ झाले आहेत. शिवाय काही तर विवाहितही आहेत. यांच्यापैकी काही महिला तर आजीही झाल्या आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की,काही दशकांपूर्वी भारतात आलेल्या या महिला आणि त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व मिळेल का, की त्यांना अजूनही पाकिस्तानी म्हटले जाईल? यामुळे आता मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

भारतीय नागरिकत्व कायदा काय म्हणतो?

भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी देशात नागरिकत्व कायदा, १९५५ लागू आहे. याअंतर्गत, नागरिकत्व प्रामुख्याने पाच प्रकारे दिले जाऊ शकते. जर, एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला, तर त्याला जन्माने नागरिकत्व मिळू शकते. वंशावळीनुसार,जर आई किंवा वडील भारतीय नागरिक असतील तर, मुलाला नागरिकत्व मिळू शकते. भारतीय नागरिकाशी विवाह केलेले आणि काही वर्षांपासून भारतात राहत असलेले परदेशी नागरिक गृह मंत्रालयाकडे अर्ज करून नागरिकत्व मिळवू शकतात. भारतात दीर्घकाळ (सामान्यतः ११ वर्षे) कायदेशीररित्या वास्तव्य करणारे परदेशी नागरिक काही अटी पूर्ण करून नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. भारतीय भूभागाचा कोणताही भाग भारतात विलीन झाल्यास तेथील लोकांना भारतीय नागरिकत्व मिळते.

मुरादाबादमधील २२ पाकिस्तानी महिलांचं काय होणार?

मुरादाबादमधील २२ पाकिस्तानी महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न केले आहे. त्या गेल्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत. त्यांच्या मुलांचा जन्म भारतात झाल्याने, नागरिकत्व जन्म आणि वंशाच्या आधारावर निश्चित केले जाऊ शकते. परंतु, जर त्या महिलांनी अद्याप नागरिकत्वासाठी औपचारिकपणे अर्ज केला नसेल, तर त्यांना कायदेशीररित्या परदेशी मानले जाईल. अशा अनियमित रहिवाशांनाही भारत सोडून पाकिस्तानला रवाना होऊ लागू शकते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानUttar Pradeshउत्तर प्रदेशwarयुद्धIndiaभारत