शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:50 IST

मुरादाबादमध्ये अशा २२ महिला आढळल्या आहेत, ज्यांचे राष्ट्रीयत्व अजूनही पाकिस्तानी आहे, परंतु त्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत.  

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयांमध्ये पाकिस्तानसोबतच्या राजनैतिक आणि व्यावसायिक संबंधांवर पुनर्विचार करणे, भारतात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि त्यांना देशातून परत पाठवणे, देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याची प्रक्रिया जलद करणे यांचा समावेश आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परत पाठवण्याच्या कारवाईदरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादाबादमध्ये अशा २२ महिला आढळल्या आहेत, ज्यांचे राष्ट्रीयत्व अजूनही पाकिस्तानी आहे, परंतु त्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत.  

इतकंच नाही तर, या सर्व महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न केले आहे आणि त्या इथेच राहत आहेत. या महिलांना एकूण ९५ मुले आहेत, त्यापैकी अनेकजण आता प्रौढ झाले आहेत. शिवाय काही तर विवाहितही आहेत. यांच्यापैकी काही महिला तर आजीही झाल्या आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की,काही दशकांपूर्वी भारतात आलेल्या या महिला आणि त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व मिळेल का, की त्यांना अजूनही पाकिस्तानी म्हटले जाईल? यामुळे आता मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

भारतीय नागरिकत्व कायदा काय म्हणतो?

भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी देशात नागरिकत्व कायदा, १९५५ लागू आहे. याअंतर्गत, नागरिकत्व प्रामुख्याने पाच प्रकारे दिले जाऊ शकते. जर, एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला, तर त्याला जन्माने नागरिकत्व मिळू शकते. वंशावळीनुसार,जर आई किंवा वडील भारतीय नागरिक असतील तर, मुलाला नागरिकत्व मिळू शकते. भारतीय नागरिकाशी विवाह केलेले आणि काही वर्षांपासून भारतात राहत असलेले परदेशी नागरिक गृह मंत्रालयाकडे अर्ज करून नागरिकत्व मिळवू शकतात. भारतात दीर्घकाळ (सामान्यतः ११ वर्षे) कायदेशीररित्या वास्तव्य करणारे परदेशी नागरिक काही अटी पूर्ण करून नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. भारतीय भूभागाचा कोणताही भाग भारतात विलीन झाल्यास तेथील लोकांना भारतीय नागरिकत्व मिळते.

मुरादाबादमधील २२ पाकिस्तानी महिलांचं काय होणार?

मुरादाबादमधील २२ पाकिस्तानी महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न केले आहे. त्या गेल्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत. त्यांच्या मुलांचा जन्म भारतात झाल्याने, नागरिकत्व जन्म आणि वंशाच्या आधारावर निश्चित केले जाऊ शकते. परंतु, जर त्या महिलांनी अद्याप नागरिकत्वासाठी औपचारिकपणे अर्ज केला नसेल, तर त्यांना कायदेशीररित्या परदेशी मानले जाईल. अशा अनियमित रहिवाशांनाही भारत सोडून पाकिस्तानला रवाना होऊ लागू शकते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानUttar Pradeshउत्तर प्रदेशwarयुद्धIndiaभारत