शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
3
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
4
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
5
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
6
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
7
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
9
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
10
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
11
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
12
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
13
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
14
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
15
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
16
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
17
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
18
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
19
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
20
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:50 IST

मुरादाबादमध्ये अशा २२ महिला आढळल्या आहेत, ज्यांचे राष्ट्रीयत्व अजूनही पाकिस्तानी आहे, परंतु त्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत.  

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयांमध्ये पाकिस्तानसोबतच्या राजनैतिक आणि व्यावसायिक संबंधांवर पुनर्विचार करणे, भारतात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि त्यांना देशातून परत पाठवणे, देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याची प्रक्रिया जलद करणे यांचा समावेश आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परत पाठवण्याच्या कारवाईदरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादाबादमध्ये अशा २२ महिला आढळल्या आहेत, ज्यांचे राष्ट्रीयत्व अजूनही पाकिस्तानी आहे, परंतु त्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत.  

इतकंच नाही तर, या सर्व महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न केले आहे आणि त्या इथेच राहत आहेत. या महिलांना एकूण ९५ मुले आहेत, त्यापैकी अनेकजण आता प्रौढ झाले आहेत. शिवाय काही तर विवाहितही आहेत. यांच्यापैकी काही महिला तर आजीही झाल्या आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की,काही दशकांपूर्वी भारतात आलेल्या या महिला आणि त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व मिळेल का, की त्यांना अजूनही पाकिस्तानी म्हटले जाईल? यामुळे आता मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

भारतीय नागरिकत्व कायदा काय म्हणतो?

भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी देशात नागरिकत्व कायदा, १९५५ लागू आहे. याअंतर्गत, नागरिकत्व प्रामुख्याने पाच प्रकारे दिले जाऊ शकते. जर, एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला, तर त्याला जन्माने नागरिकत्व मिळू शकते. वंशावळीनुसार,जर आई किंवा वडील भारतीय नागरिक असतील तर, मुलाला नागरिकत्व मिळू शकते. भारतीय नागरिकाशी विवाह केलेले आणि काही वर्षांपासून भारतात राहत असलेले परदेशी नागरिक गृह मंत्रालयाकडे अर्ज करून नागरिकत्व मिळवू शकतात. भारतात दीर्घकाळ (सामान्यतः ११ वर्षे) कायदेशीररित्या वास्तव्य करणारे परदेशी नागरिक काही अटी पूर्ण करून नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. भारतीय भूभागाचा कोणताही भाग भारतात विलीन झाल्यास तेथील लोकांना भारतीय नागरिकत्व मिळते.

मुरादाबादमधील २२ पाकिस्तानी महिलांचं काय होणार?

मुरादाबादमधील २२ पाकिस्तानी महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न केले आहे. त्या गेल्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत. त्यांच्या मुलांचा जन्म भारतात झाल्याने, नागरिकत्व जन्म आणि वंशाच्या आधारावर निश्चित केले जाऊ शकते. परंतु, जर त्या महिलांनी अद्याप नागरिकत्वासाठी औपचारिकपणे अर्ज केला नसेल, तर त्यांना कायदेशीररित्या परदेशी मानले जाईल. अशा अनियमित रहिवाशांनाही भारत सोडून पाकिस्तानला रवाना होऊ लागू शकते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानUttar Pradeshउत्तर प्रदेशwarयुद्धIndiaभारत