शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 16:18 IST

इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ठळक मुद्देचीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीलाकोरोना व्हायरसमुळे इटलीत 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू सर्वंना 14 दिवसांसाठी ठेवण्यात येणार  देखरेखीखाली 

नवी दिल्ली - चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीतून २१८ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. या नागरिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आहे. हे सर्वजण दिल्लीत पोहोचले आहेत. यात 211 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आणण्यात आलेल्या या सर्वंना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) छावला येथील कॅम्पमध्ये त्यांना ठेवण्यात येईल. संकटकाळी भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे. 

भारत सरकारने एकाच दिवसात 400 हून अधिक नागरिकांना एअरलिफ्ट करून भारतात आणण्यात आले आहे. यापूर्वी ईरानमधून आज सकाळी 234 जणांना भारतात आणण्यात आले आहे. त्यांना जैसलमेर येथील भारतीय लष्कराच्या वेलनेस सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

शनिवारी दुपारी रवाणा झाले होते विमान

हे विमान शनिवारी दुपारी दिल्लीहून मिलानला रवाना झाले होते. यासंदर्भात, बोइंग 787 वर संचलित विमान रविवारी दुपारपर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एअरलाइनने दिल्ली-रोम आणि दिल्ली-मिलान मार्गावर 28 मार्चपर्यंत उड्डाने स्थगित केली आहेत. 

या पूर्वी एअर इंडियाने शंघायहून 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत आणि हांगकाँगहून 7 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत विमान उड्डान रद्द केले आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 96वरून 108वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, जगभरात 1,45,000 रुग्ण कोरोनाबाधित असून, जवळपास 5 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसItalyइटलीIndiaभारतAir Indiaएअर इंडिया