शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“२०२४ मध्ये आश्चर्यचकित करणारे निकाल दिसतील, धर्माच्या नावाखाली सरकारकडून लोकांची फसवणूक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 23:21 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ दिग्विजय सिंह यांचा आरोप. सर्जिकल स्ट्राईक, अदानी प्रकरण, भारत जोडोवरही केलं वक्तव्य.

२०२४ मध्ये आश्चर्यचकित करणारे निकाल दिसतील. तसंच धर्माच्या नावाखाली सरकारकडून लोकांची फसवणूक होत असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचं कधी कौतुक तर करणार नाहीत. पण देशात काय होत आहे हे त्यांनी पाहावं. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब आणखी गरीब. सोबतच बेरोजगारी वाढत आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींना दिसत नाही. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांची कविता वाचली, त्यांचंच भोपाळमधील वडिलोपार्जित घर जमिनदोस्त करण्यात आलं,”असं त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. 

बोलताना दिग्विजय सिंह यांनी अदानी मुद्द्यावरही भाष्य केलं. “हर्षद मेहता केसमध्ये आमच्या सरकारनं जेपीसीचा तपास केला. आता अदानी देशाला लुटत आहेत. एक रिपोर्ट आलाय की अदानी समूहाने कसा भ्रष्टाचार केला. परंतु पंतप्रधान मोदी काहीही बोलत नाहीत. सरकार या प्रकरणी जेपीसीचा तपास का करत नाहीत?” असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. टीव्ही ९ भारतवर्षशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांना काँग्रेस सरकारच्या काळात रॉबर्ड वाड्रा यांच्या संपत्तीत वाढ झाल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर असं असेल तर सरकारनं याचा तपास करावा, असंही ते म्हणाले. 

"३५ए मुळे काश्मिरींना फायदा"“काश्मीरमध्ये हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन सर्वच आहेत. ३५ए मुळे काश्मिरी जनतेला फायदा होता. जेव्हा आम्ही प्रवास करत होतो तेव्हा जम्मूच्या हिंदूंनी बाहेरचे लोक आमच्या जमिनी खरेदी करत असल्याचं म्हटलं. आमचा व्यवसाय संपला आहे. आम्ही कलम ३७० वर बोलणार नाही कारण आता तो मुद्दा संपलाय. काश्मिरीयत अबाधित राहावी याची आम्हाला चिंता आहे,” असं त्यांनी नमूद केलं. 

"हिंदू धर्माचं हिंदुत्वाशी घेणंदेणं नाही"“सावरकरांनी हिंदुत्व या शब्दाचा शोध लावला. हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. या देशात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहत आहेत. दोघांनी मिळून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आरएसएसने माझ्यावर मानहानीचा दावा केला आहे. मी खरा देशभक्त आहे,” असं दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

"मतांसाठी भारत जोडो यात्रा नाही"देशाच्या परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घ्यावे लागतात. देशात भीतीचे वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी आम्ही देश जोडण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली. देशात महागाई आणि बेरोजगारी आहे. आम्ही मतांसाठी नव्हे तर भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी प्रवास केल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्जिकल स्ट्राईकवरही वक्तव्य“सर्जिकल स्ट्राईकवर मी जे काही बोललो, त्यावर माझ्या पक्षांतर्गत आक्षेप असू शकतात, पण मला त्यात काही अडचण नाही. मी मुख्यमंत्री असताना नोकरीत आरक्षण दिले. पुलवामा हा दहशतवाद्यांनी प्रभावित क्षेत्र आहे. तेथे राहुल गांधी यांनी पुष्प अर्पण केले. पुलवामामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले, हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश होते. पण कोणावरही कारवाई झाली नाही. माझे प्रश्न या विषयावर होते,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह