शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

“२०२४ मध्ये आश्चर्यचकित करणारे निकाल दिसतील, धर्माच्या नावाखाली सरकारकडून लोकांची फसवणूक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 23:21 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ दिग्विजय सिंह यांचा आरोप. सर्जिकल स्ट्राईक, अदानी प्रकरण, भारत जोडोवरही केलं वक्तव्य.

२०२४ मध्ये आश्चर्यचकित करणारे निकाल दिसतील. तसंच धर्माच्या नावाखाली सरकारकडून लोकांची फसवणूक होत असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचं कधी कौतुक तर करणार नाहीत. पण देशात काय होत आहे हे त्यांनी पाहावं. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब आणखी गरीब. सोबतच बेरोजगारी वाढत आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींना दिसत नाही. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांची कविता वाचली, त्यांचंच भोपाळमधील वडिलोपार्जित घर जमिनदोस्त करण्यात आलं,”असं त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. 

बोलताना दिग्विजय सिंह यांनी अदानी मुद्द्यावरही भाष्य केलं. “हर्षद मेहता केसमध्ये आमच्या सरकारनं जेपीसीचा तपास केला. आता अदानी देशाला लुटत आहेत. एक रिपोर्ट आलाय की अदानी समूहाने कसा भ्रष्टाचार केला. परंतु पंतप्रधान मोदी काहीही बोलत नाहीत. सरकार या प्रकरणी जेपीसीचा तपास का करत नाहीत?” असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. टीव्ही ९ भारतवर्षशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांना काँग्रेस सरकारच्या काळात रॉबर्ड वाड्रा यांच्या संपत्तीत वाढ झाल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर असं असेल तर सरकारनं याचा तपास करावा, असंही ते म्हणाले. 

"३५ए मुळे काश्मिरींना फायदा"“काश्मीरमध्ये हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन सर्वच आहेत. ३५ए मुळे काश्मिरी जनतेला फायदा होता. जेव्हा आम्ही प्रवास करत होतो तेव्हा जम्मूच्या हिंदूंनी बाहेरचे लोक आमच्या जमिनी खरेदी करत असल्याचं म्हटलं. आमचा व्यवसाय संपला आहे. आम्ही कलम ३७० वर बोलणार नाही कारण आता तो मुद्दा संपलाय. काश्मिरीयत अबाधित राहावी याची आम्हाला चिंता आहे,” असं त्यांनी नमूद केलं. 

"हिंदू धर्माचं हिंदुत्वाशी घेणंदेणं नाही"“सावरकरांनी हिंदुत्व या शब्दाचा शोध लावला. हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. या देशात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहत आहेत. दोघांनी मिळून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आरएसएसने माझ्यावर मानहानीचा दावा केला आहे. मी खरा देशभक्त आहे,” असं दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

"मतांसाठी भारत जोडो यात्रा नाही"देशाच्या परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घ्यावे लागतात. देशात भीतीचे वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी आम्ही देश जोडण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली. देशात महागाई आणि बेरोजगारी आहे. आम्ही मतांसाठी नव्हे तर भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी प्रवास केल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्जिकल स्ट्राईकवरही वक्तव्य“सर्जिकल स्ट्राईकवर मी जे काही बोललो, त्यावर माझ्या पक्षांतर्गत आक्षेप असू शकतात, पण मला त्यात काही अडचण नाही. मी मुख्यमंत्री असताना नोकरीत आरक्षण दिले. पुलवामा हा दहशतवाद्यांनी प्रभावित क्षेत्र आहे. तेथे राहुल गांधी यांनी पुष्प अर्पण केले. पुलवामामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले, हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश होते. पण कोणावरही कारवाई झाली नाही. माझे प्रश्न या विषयावर होते,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह