शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी २०० दिवस संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 23:22 IST

नवी मुंबईत पालिकेची तारेवरची कसरत सुरू : मृत्युदर कमी करण्यात यश; व्हेंटिलेटर्ससह आयसीयूची कमतरता कायम

नामदेव मोरे 

नवी मुंबई : कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी २०० दिवस अविरतपणे संघर्ष सुरू आहे. मृत्युदर कमी करण्यात काही प्रमाणात यश आले असले, तरी रुग्णांना व्हेंटिलेटर्ससह आयसीयू युनिटची कमतरता भासत आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले जनजीवनही सुरळीत होत आहे. लोकल बंद असल्यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी चाकरमान्यांची तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र शहरात दिसते आहे.

नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. या महामारीला २८ सप्टेंबरला २०० दिवस पूर्ण झाले. या कालावधीमध्ये शहरातील रुग्णसंख्येने ३५ हजारांचा टप्पा पूर्ण केला. ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले व सातशेपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिला रुग्ण सापडल्यापासून महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाच्या सूचनेप्रमाणे त्रिस्तरीय रुग्णालयीन व्यवस्था तयार केली.सुरुवातीला भीतीमुळे शहरातील खासगी रुग्णालये बंद झाल्यानंतर, शहरवासीयांच्या सुविधेसाठी फ्लू क्लिनिकची संकल्पना राबविण्यात आली. १,२०० बेडचे सुसज्ज रुग्णालये उभारण्यात आले. आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स व मनपाच्या इतर विभागांतील अधिकारी व कर्मचारीही अविश्रांतपणे परिश्रम घेत आहेत. अनेकांनी या कालावधीमध्ये एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. शहरातील मृत्युदर तीनवरून दोन टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे. मनपाने आतापर्यंत जवळपास १ लाख ९० हजार नागरिकांची कोरोना चाचणी पूर्ण केली आहे. ४ लाख ७० हजार नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. स्वत:ची आरटीपीसीआर चाचणी लॅब सुरू केली असून, अँटिजन चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ठप्प झालेले जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. बार, स्विमिंग पूल, सिनेमागृह वगळता, इतर सर्व व्यवसाय व आस्थापना सुरू झाल्या आहेत. हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू नसली, तरी पार्सल सेवा सुरू झाली आहे. मुंबईमधील चाकरमानी पुन्हा कामावर जाऊ लागले आहेत, परंतु लोकल सेवा बंद असल्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोनाचे संकट विसरून रोजी-रोटीसाठी नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्ण वाढत आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये भरपूर बेड उपलब्ध आहेत, परंतु व्हेंटिलेटर्स व आयसीयूसाठी अनेक रुग्णालयात वेटिंग लिस्ट सुरू झाली आहे. मनपा प्रशासनाने या सुविधा मोठ्या प्रमाणात विनाविलंब वाढविण्याची मागणी केली जात आहे, अन्यथा कमी झालेला मृत्युदर पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोरोना नियंत्रणासाठी मनपाने केलेल्या उपाययोजना आणि आलेले यशच्मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास ६ हजार बेड उपलब्ध केलेच्वाशी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय उभे केलेच्नेरुळ माता-बाल रुग्णालयात प्रतिदिन एक हजार क्षमतेची आरटीपीसीआर लॅब तयार केलीच्दोनशे दिवसांमध्ये जवळपास १ लाख ९० हजार नागरिकांची चाचणी करण्यात यशच्मृत्युदर तीनवरून दोन टक्क्यांवर आणण्यात यश मिळविलेच्रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के करण्यात यशच्लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बेघर व निराश्रितांना निवारा व अन्नपुरवठाच्सर्व घटकांना विश्वासात घेऊन शहरात व्यापक जनजागृतीच्रुग्ण व नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू केलेच्मनपाच्या रुग्णालयासह २१ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचाराची यंत्रणाच्रुग्णांची लुबाडणूक करणाºया रुग्णांवर कारवाई करून नागरिकांना पैसे मिळवून दिले.शहरातील प्रतिहजार रुग्णवाढीचा तपशीलदिनांक रुग्ण१३ मार्च ११५ मे १०००२३ जून ५०००१५ जुलै १००००३१ जुलै १५०००१४ आॅगस्ट २००००२९ आॅगस्ट २५०००१२ सप्टेंबर ३००००२६ सप्टेंबर ३५०००रुग्णालयातील बेडची स्थितीप्रकार क्षमता वापर शिल्लकआयसीयू ३६५ ३३८ २७व्हेंटिलेटर्स १३३ १२४ ९आॅक्सिजन २११८ ९९८ ११२०आॅक्सिजन विरहित ३३०८ १४११ १८९७कोरोनाची सद्यस्थितीएकूण चाचण्या १९१०७९एकूण रुग्ण ३५९३४कोरोनामुक्त ३१६७२मृत्यू ७४०मृत्यूदर २.०५शिल्लक रुग्ण ३५२२क्वॉरंटाइन ३६१११क्वारंटाइन पूर्ण ४३९००७दोन प्रमुखांनी काढला पळकोरोना वाढल्यानंतर मनपातल्या अनेकांनी २०० दिवसांत सुट्टी घेतलेली नाही, तर कोरोनाची जबाबदारी असणाºया दोन मुख्य अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतून बदली घेतली. यामुळे त्यांनी पळ काढल्याची टीका झाली.चाकरमान्यांची गैरसोयबहुतांश सर्व कार्यालये सुरू झाली आहेत. शहरवासी नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडत आहेत, परंतु लोकल बंद असल्यामुळे मुंबई व उपनगरांमध्ये जाण्यासाठी वाहतुकीची पुरेशी सुविधा नाही. मोटारसायकलवरून अनेक जण प्रतिदिन ५० ते ८० किलोमीटर प्रवास करत आहेत. बसेसची संख्याही अपुरी असल्यामुळे कार्यालयात पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांचे हाल सुरूचकोरोनामुक्त नवी मुंबई करण्याच्या प्रयत्नामध्ये इतर आजार असणाºया रुग्णांकडे दुर्लक्ष झाले आहे. इतर आजारांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू असलेले मनपाचे एकही रुग्णालय सुरू नाही. प्रमुख खासगी रुग्णालयांनीही कोरोनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सद्यस्थितीमध्ये कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाºया रुग्णांची गैरसोय सुरूच आहे. जनरल हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यास उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या