शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

2 Years of Modi 2.0: कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर जनता खूश, पण मोदी सरकारच्या कृषि कायद्यांबाबत वेगळा कौल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 13:08 IST

पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यासाठी या सरकारला विरोधाचा सामनाही करावा लागला. पण याची फारशी तमा या सरकारने बाळगली नाही आणि आपले काम ठरलेल्या पद्धतीप्रमाणे सुरूच ठेवले. (2 Years of Narendra Modi government )

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी भाजपला एकहाती बहुमत मिळवून दिले. ते पंतप्रधान झाल्यापासून नेहमीच त्यांच्या कामाची तुलना काँग्रेसने केलेल्या 70 वर्षांच्या कामाशी करण्यात येते. मोदींनी त्यांच्या सात वर्षांच्या कार्य काळात अनेक मोठे, धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. यांत काश्मिरचे कलम 370 हटविणे, नवे कृषी कायदे, सीएए, सर्जिकल आणि एअर स्ट्राइक, जीएसटी, नोटाबंदी आणि चीन विषयक धोरण, अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे. सध्या भजपही मोदी सरकारने गत सात वर्षांत केलेल्या कार्यांचा 'लेखा-जोखा' देशासमोर मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकमत डॉट. कॉमने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासंदर्भात जनमताचा कौल घेतला आहे. (2 Years of Modi 2.0: People happy with the Modi government decision about 370, but a different opinion on the agricultural laws)

2 Years of Modi 2.0: २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत का?; बघा, किती टक्के जनता म्हणते 'हो'

पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यासाठी या सरकारला विरोधाचा सामनाही करावा लागला. पण याची फारशी तमा या सरकारने बाळगली नाही आणि आपले काम ठरलेल्या पद्धतीप्रमाणे सुरूच ठेवले. मात्र, या सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले, ते कोरोना महामारीचे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले. मात्र, दुसऱ्या लाटेत मोदी सरकारची हतबलताही दिसून आली. मोदी सरकारच्या याच टर्ममध्ये अयोध्येतील राम मंदिराचा तिढा सुटला, काश्मीरचे कलम 370 हटले, नवे कृषी कायदे तयार झाले आणि भारत-चीन संघर्षही झाला. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात कलम 370 हटविण्याचा निर्णय आणि नवे कृषी कायदे आणण्याचा निर्णय अत्यंत चर्चेत राहिला. देशात कृषी कायद्यांविरोधात तर गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरूच आहेत. लोकमत डट कॉमने यासंदर्भात जो जनमताचा कौल घेतला, त्यात 370 कलम हटविण्याचा सरकारचा निर्णय जनतेने योग्य ठरवला. मात्र, शेतकरी धोरणासंदर्भात लोक फोरसे समाधानी नाहीत, असे दिसून आले आहे. जाणून घेऊया, काय होते लोकमत डॉट कॉमनेचे प्रश्न आणि काय आहे जनतेचा कौल... 

2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल

लोकमत डॉट कॉमने विचारलेले प्रश्न -1. 370 कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य वाटतो का? -लोकमतने विचारलेल्या या प्रश्नावर तब्बल 77.45 टक्के लोकांनी 'होय', असे उत्तर दिले आहे. 14.11 टक्के लोकांनी 'नाही', असे उत्तर दिले आहे. तर 8.44 टक्को लोकांनी 'माहीत नाही', असे उत्तर दिले आहे. कलम 370 हे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम होते. हे कलम हटवून सरकारने जम्मू आणि काश्मीरचे, जम्मू-काश्मीर आणि लडाख, अशा दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले आहे.

2. मोदी सरकारच्या काळात भारताने चीनला धडा शिकवला, असे वाटते का? -या प्रश्नावर 46.92 टक्के वाचकांनी 'नाही', असे उत्तर दिले, 40.64 टक्के लोकांनी 'होय', असे उत्तर दिले, तर 12.44 टक्के लोकांनी 'काही प्रमाणात' धडा शिकवला, असे उत्तर दिले आहे. आपल्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारला चीनच्या आव्हानाचाही  सामना करावा लागला. सरकारच्या याच कार्यकाळात गलवानमधील भारत-चीन सैन्यात हिंसक झटापट होऊन दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर आमनेसामने उभे ठाकले होते. याच काळात मोदी सरकारने चीनी व्यापार विषयक धोरनाच्या पार्श्वभूमीवरही अनेक मोठे निर्णय घेतले.

3. मोदी सरकारच्या शेतीविषयक कायद्यांविषयी तुमचे मत काय आहे? ते योग्य वाटतात का? -

लोकमत डॉट कॉमने विचारलेल्या या प्रश्नावर, 43.58 टक्के लोक 'होय' म्हणत आहेत, 47.55 टक्के लोक 'नाही' म्हणत आहेत, तर 8.87 टक्के लोक 'सांगता येत नाही' असे म्हणत आहेत.

4. राम मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होईल, असे वाटते? -लोकमतच्या या प्रश्नावर, 18.73 टक्के लोकांनी 2023 पर्यंत, 34.28 टक्के लोकांनी 2024 पर्यंत, 17.20 टक्के लोकांनी 2025 पर्यंत तर 29.79 टक्के लोकांनी 2030 पर्यंत असे उत्तर दिले आहे. मोदी सरकारच्या याच कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निकाल दिला आहे.

2 Years of Modi 2.0: लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता, पण कोरोना संकट हाताळण्यात....; पाहा जनमत चाचणीचा रिझल्ट

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतArticle 370कलम 370