शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

त्यावेळी सपा-बसपा आघाडीने उडवली होती भाजपाची दाणादाण, आता असे असेल मतांचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 17:16 IST

लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने उत्तर प्रदेशात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहे. मात्र सपा आणि बसपाने आघाडी करून निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही.

ठळक मुद्देसपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहेसपाचे मुलायम सिंह यादव आणि बसपाचे तत्कालीन सर्वेसर्वा काशीराम यांनी 1993 मध्ये विधानसभेसाठी आघाडी केली होती. या आघाडीने राम मंदिर आंदोलनामुळे उधळलेल्या भाजपाच्या वारूला लगाम घालून पराभूत केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 प्रमाणे मतदान झाले तरी भाजपाला अर्ध्याहून अधिक जागांवर पाणी सोडावे लागणार आहे.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने  उत्तर प्रदेशात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहे. या आघाडीमुळे 2014 साली उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. सपा आणि बसपाने आघाडी करून निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी राम मंदिराचे राजकारण ऐन बहरात असतानाही सपा आणि बसपाने आघाडी करून भाजपाला पराभूत करण्याची किमया साधली होती. दरम्यान, सध्याही मतांची आकडेवारी आणि जातीय समीकरण या पक्षांच्या बाजूने असल्याने  मायावती आणि अखिलेश यादव यांची बुआ-बबुआची जोडी कोणती कमा दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 25 वर्षांपूर्वी राम मंदिर आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीचा विध्वंस झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्यात आले होते. तसेच राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी सपाचे मुलायम सिंह यादव आणि बसपाचे तत्कालीन सर्वेसर्वा काशीराम यांनी 1993 मध्ये विधानसभेसाठी आघाडी केली होती. या आघाडीने राम मंदिर आंदोलनामुळे उधळलेल्या भाजपाच्या वारूला लगाम घालून पराभूत केले होते. त्यावेळी 422 जागा असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत सपाला 109, बसपाला 67 तर भाजपाला 177 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सपा आणि बसपा आघाडीला 29.06 टक्के मते मिळाली होती. तर भाजपाला 33.3 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर जनता दलाचा पाठिंबा घेऊन सपा-बसपाने सरकार स्थापन केले होते. ''मिले मुलायम-कांशीराम, हवा हो गए जय श्रीराम'' हा नारा तेव्हा उत्तर प्रदेशात प्रसिद्ध झाला होता.  दरम्यान, उत्तर प्रदेशातील राजकीय इतिहासात कुप्रसिद्ध झालेल्या गेस्ट हाऊस प्रकरणानंतर ही आघाडी मोडीत निघाली. तसेच सपा आणि बसपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये हाडवैर निर्माण झाले होते. 

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या उदयानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपा आणि बसपाचा दारुण पराभव होऊन त्यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कटू इतिहास विसरून दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय बेरीज वजाबाकी नव्या समीकरणाद्वारे होणार आहे. समजा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 प्रमाणे मतदान झाले तरी भाजपाला अर्ध्याहून अधिक जागांवर पाणी सोडावे लागणार आहे.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाल 71 आणि मित्र पक्ष असलेल्या अपना दलला 2 जागा मिळाल्या होत्या. भाजपा आणि अपना दलला मिळून 43.63 टक्के मते मिळाली होती. तर सपा आणि बसपाला एकत्रित मिळून 42.12 टक्के मते मिळाली होती. आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघाप्रमाणे या मतांची विभागणी केल्यास 41 जागांवर सपा आणि बसपाचे मताधिक्य भाजपापेक्षा अधिक आहे. तर त्यात आरएलडीची मते जोडल्यास हा आकडा 42 मतदारसंघांवर जातो. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे मतदान झाल्यास भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना मिळून 41.35 टक्के मते मिळतील. तर सपा आणि बसपाच्या मतांची एकत्रित बेरीज  44.05 एवढी होते. यामध्ये आरएलडीच्या मतांचा समावेश केल्यास हा आकडा 45.83 एवढा होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 312 आणि त्याच्या मित्र पक्षांना 13 जागांवर विजय मिळाला होता. तर सपाला 47, बसपाला 19 आणि काँग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला होता. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादवPoliticsराजकारण