शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'Air India Plane Crash' : १९० प्रवाशांचे विमान उतरताना रनवेवरून घसरले, 21 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:00 IST

Air India Plane Crash in Kerla, Latest News केरळमध्ये अपघात : भारतीयांना दुबईहून घेऊन आले होते एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान

कोझिकोड : कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले. अपघातात अनेकजण दगावले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी मृतांचा आकडा १० तर जखमींचा आकडा ५० पर्यंत दिला. पण त्याला लगेच अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात २० जणांंचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका वैमानिकाचाही समावेश आहे.

हे विमान बोईग ७३७ होते व ते ठरल्या वेळी म्हणजे साय. ७.४१ वाजता विमानतळावर उतरले. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमानात १७४ प्रौढ प्रवासी, १० तान्ही मुले, दोन वैमानिक व चार विमान कर्मचारी असे एकूण १९० जण होते. कोळीकोडचे विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीच्या दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता. धावपट्टीची लांबी वाढवण्याची गरज असताना के वळ स्थानिक राजकारणामुळे ते होऊ शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.भाजपाचे केरळमधील ज्येष्ठ नेतेके. जे. अल्फोन्स यांनी याआधी शनिवारीसकाळी मुन्नारजवळ चहामळ््यात कामगारांच्या वसाहतीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत टष्ट्वीटरवर लिहिले की, केरळमध्ये दिवसभारीतील हा दुसरा मोठा आपघात झाला.कोझिकोड येथे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून त्याच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. वैमानिकाचा मृत्यू झाला व कित्येक प्रवासी जखमी जाले. विमानाला आग लागली नाही हे सुदैव.चौकशीचे दिले आदेशनागरी विमान वाहतूक संचालनालयातील सूत्रांनुसार हे विमान मुसळधार पावसातही सुखरूपणे जमिनीवर उतरले.पण नंतर टर्मिनलच्या दिशेने धावत असताना ते धावपट्टीवरून घसरले व बाजूला असलेल्या खोल खड्डयात पडून त्याचे दोन तुकडे झाले.संचालनालयाने मदत व बचाव कार्याची व्यवस्था करण्यासोबतच या घटनेच्या चौकशीचाही आदेश दिला आहे.वैमानिक होते मराठीया विमानाचे सारथ्य कॅ. दीपक वसंत साठे या मराठी वैमानिकाकडे होते. हवाईदलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते एअर इंडियात आले होते. १५ वर्षे ते एअर इंडियामध्ये होते. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यूमुंबई : केरळमधील कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मुख्य वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला. एअर इंडियात वैमानिक म्हणून रूजू होण्यापूर्वी साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती. एनडीएतील शिक्षणानंतर ११ जून १९८१ साली ते लष्करी सेवेत दाखल झाले. १९९१ ते २००३ या कालावधीत मिलिटरी एव्हिएशनमध्ये ते एक्सपेरीमेंटल टेस्ट पायलट म्हणून काम पाहत होते. विंग कमांडर दीपक साठे ३० जून २००३ मध्ये लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते एअर इंडियात वैमानिक म्हणून दाखल झाले. अत्यंत हुशार आणि प्रवीण वैमानिक म्हणून त्यांची ख्याती होती.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातKeralaकेरळDeathमृत्यू