शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:34 IST

३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

अहमदाबाद : देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. महाराष्ट्राशिवाय गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यांना पावसाचा तडाखा असला आहे. त्यातही गुजरातमध्येपूरस्थिती अतिशय गंभीर असून, गेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद करण्यात आला असून, त्यामुळे मुंबई व नागपूरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये जून महिन्यापासून देशभरात २२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आतार्यंत ३१ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. एकट्या गुजरातमध्येच गेल्या चार दिवसांमध्ये ८३ जणांचा अतिवृष्टीमुळे  वलसाड, नवसारी, डांग, जूनागड, साेमनाथ हे या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. नवसारीमध्ये वांसडा तालुक्यात गेल्या २४ तासांमध्ये ४०० मिलिमीटर पाऊस झाला. या ठिकाणी अनेक भागात गुडघाभर पाणी आहे. पुरामुळे मुंबई-अहमदाबाद आणि नागपूर-सूरत महामार्ग बंद करण्यात आला आहे. वलसाडमध्ये कापरादा आणि धर्मापूर तालुक्यात ३५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. 

अहमदाबादजवळ तीन महिलांचा मृत्यूअहमदाबाद शहराजवळ ओगनाज भागात सुरक्षा भिंत कोसळून दोन महिला मजूर व एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर पाच महिला जखमी झाल्या आहेत. या महिला तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये राहत होत्या. 

मध्य प्रदेशमध्ये नर्मदा धोक्याच्या पातळीवरमध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत ६६ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. राजधानी भोपाळमध्ये २२ इंच पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्य प्रमाणापेक्षात ११ इंच जास्त पाउस या ठिकाणी झाला आहे. इंदूरमध्येही गेल्या २४ तासांत ३ इंच पाउस पडला आहे. 

राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारीराजस्थानमध्ये बांसवाडा, झालावाड, भीलवाडा, अलवर इत्यादी जिल्ह्यांमध्ये ४ ते ५ इंच पावसाची नोंद झाली. सिरोही आणि उदयपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तेलंगणामध्ये शाळा, महाविद्यालयांना १६ जुलैपर्यंत सुट्टीतेलंगणामध्येही मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांची सुट्टी १६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये टिहरी जिल्ह्यात गंगा नदीमध्ये ४ जण वाहून गेले. 

टॅग्स :GujaratगुजरातfloodपूरRainपाऊस