शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:34 IST

३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

अहमदाबाद : देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. महाराष्ट्राशिवाय गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यांना पावसाचा तडाखा असला आहे. त्यातही गुजरातमध्येपूरस्थिती अतिशय गंभीर असून, गेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद करण्यात आला असून, त्यामुळे मुंबई व नागपूरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये जून महिन्यापासून देशभरात २२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आतार्यंत ३१ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. एकट्या गुजरातमध्येच गेल्या चार दिवसांमध्ये ८३ जणांचा अतिवृष्टीमुळे  वलसाड, नवसारी, डांग, जूनागड, साेमनाथ हे या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. नवसारीमध्ये वांसडा तालुक्यात गेल्या २४ तासांमध्ये ४०० मिलिमीटर पाऊस झाला. या ठिकाणी अनेक भागात गुडघाभर पाणी आहे. पुरामुळे मुंबई-अहमदाबाद आणि नागपूर-सूरत महामार्ग बंद करण्यात आला आहे. वलसाडमध्ये कापरादा आणि धर्मापूर तालुक्यात ३५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. 

अहमदाबादजवळ तीन महिलांचा मृत्यूअहमदाबाद शहराजवळ ओगनाज भागात सुरक्षा भिंत कोसळून दोन महिला मजूर व एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर पाच महिला जखमी झाल्या आहेत. या महिला तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये राहत होत्या. 

मध्य प्रदेशमध्ये नर्मदा धोक्याच्या पातळीवरमध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत ६६ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. राजधानी भोपाळमध्ये २२ इंच पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्य प्रमाणापेक्षात ११ इंच जास्त पाउस या ठिकाणी झाला आहे. इंदूरमध्येही गेल्या २४ तासांत ३ इंच पाउस पडला आहे. 

राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारीराजस्थानमध्ये बांसवाडा, झालावाड, भीलवाडा, अलवर इत्यादी जिल्ह्यांमध्ये ४ ते ५ इंच पावसाची नोंद झाली. सिरोही आणि उदयपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तेलंगणामध्ये शाळा, महाविद्यालयांना १६ जुलैपर्यंत सुट्टीतेलंगणामध्येही मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांची सुट्टी १६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये टिहरी जिल्ह्यात गंगा नदीमध्ये ४ जण वाहून गेले. 

टॅग्स :GujaratगुजरातfloodपूरRainपाऊस