शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 13:13 IST

...अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता संघटनेमध्ये काही बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत अनेक राज्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाऊ शकतात. तसेच, स्थानिक पातळ्यांवरही बदल केले जातील. याशिवाय काही नेत्यांना नव्या जबाबदाऱ्याही दिल्या जाऊ शकतात. पक्षांतर्गत चर्चा आहे की, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे अनेक पदाधिकारी आहेत, मात्र त्यांना निवडणूक लढविण्याचा व लढण्याचा फारसा अनुभव नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील बड्या नेत्यांना  महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्ष यूपी आणि महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यांमध्ये 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेच्या 128 जागा या दोन राज्यांतूनच येतात. उत्तर प्रदेशात 80 जागा आहेत, यानंतर महाराष्ट्राने 48 खासदार दिल्लीला पाठवले आहेत. यूपीमध्ये भाजप पक्षाची स्थिती मजबूत मानून चालत आहे. यानंतरही 9 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेथे ते आधी जिंकू शकले नव्हते.

भाजपला उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रासंदर्भात अधिक चिंता - भाजप महाराष्ट्राच्या बाबतीत अधिक चिंतित आहे. कारण येथे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्रित आहेत. हे तिन्ही एकत्र आले, तर एक मास बेस तयार होतो. सामाजिक समीकरणही अशा पद्धतीने तयार झाले असून, यामुळे भाजपचा ताण वाढणार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित आल्याने भाजपचे विदर्भ, मराठवाड्यापासून ते मुंबईपर्यंतचे टेन्शन वाढले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून भाजपला आशा आहे. मात्र यातही, भाजप स्वतः किती जागांवर निवडणूक लढवते आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) कुठे संधी देते, हे पाहावे लागले.

160 जागा आणि तीन नेत्यांना जबाबदारी, भाजपचा मास्टर प्लॅन - सोमवारी आणि मंगळवारी अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांची बैठक झाली. या बैठकीत, संघटनेतील फेरबदलासंदर्भातही चर्चा झाली. प्रामुख्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कुणाकडे कोणती जबाबदारी द्यावी यासंदर्भातही चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, भाजपने यापूर्वीच विनोद तावडे, सुनील बंसल आणि तरुण चुग यांच्याकडे काही अशा जागांची जबाबदारी दिली आहे, जेथे पक्ष कमकुवत आहे. हे तिन्ही नेते अमित शाह यांच्या विश्वासातील आहेत. सूत्रांच्यामते, भाजपने देशभरातील अशा एकूण 160 जागा निवडल्या आहेत. ज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकVinod Tawdeविनोद तावडेAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा