शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 13:13 IST

...अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता संघटनेमध्ये काही बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत अनेक राज्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाऊ शकतात. तसेच, स्थानिक पातळ्यांवरही बदल केले जातील. याशिवाय काही नेत्यांना नव्या जबाबदाऱ्याही दिल्या जाऊ शकतात. पक्षांतर्गत चर्चा आहे की, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे अनेक पदाधिकारी आहेत, मात्र त्यांना निवडणूक लढविण्याचा व लढण्याचा फारसा अनुभव नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील बड्या नेत्यांना  महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्ष यूपी आणि महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यांमध्ये 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेच्या 128 जागा या दोन राज्यांतूनच येतात. उत्तर प्रदेशात 80 जागा आहेत, यानंतर महाराष्ट्राने 48 खासदार दिल्लीला पाठवले आहेत. यूपीमध्ये भाजप पक्षाची स्थिती मजबूत मानून चालत आहे. यानंतरही 9 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेथे ते आधी जिंकू शकले नव्हते.

भाजपला उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रासंदर्भात अधिक चिंता - भाजप महाराष्ट्राच्या बाबतीत अधिक चिंतित आहे. कारण येथे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्रित आहेत. हे तिन्ही एकत्र आले, तर एक मास बेस तयार होतो. सामाजिक समीकरणही अशा पद्धतीने तयार झाले असून, यामुळे भाजपचा ताण वाढणार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित आल्याने भाजपचे विदर्भ, मराठवाड्यापासून ते मुंबईपर्यंतचे टेन्शन वाढले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून भाजपला आशा आहे. मात्र यातही, भाजप स्वतः किती जागांवर निवडणूक लढवते आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) कुठे संधी देते, हे पाहावे लागले.

160 जागा आणि तीन नेत्यांना जबाबदारी, भाजपचा मास्टर प्लॅन - सोमवारी आणि मंगळवारी अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांची बैठक झाली. या बैठकीत, संघटनेतील फेरबदलासंदर्भातही चर्चा झाली. प्रामुख्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कुणाकडे कोणती जबाबदारी द्यावी यासंदर्भातही चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, भाजपने यापूर्वीच विनोद तावडे, सुनील बंसल आणि तरुण चुग यांच्याकडे काही अशा जागांची जबाबदारी दिली आहे, जेथे पक्ष कमकुवत आहे. हे तिन्ही नेते अमित शाह यांच्या विश्वासातील आहेत. सूत्रांच्यामते, भाजपने देशभरातील अशा एकूण 160 जागा निवडल्या आहेत. ज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकVinod Tawdeविनोद तावडेAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा