शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

Wayanad landslides : वायनाड घटनेत १५६ जणांनी गमावला जीव, भूस्खलन का झालं? शास्त्रज्ञांनी कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:30 IST

Wayanad landslides : केरळमध्ये सुरू असलेला अधिक पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना याचे कारण अरबी समुद्रातील वाढते तापमान असल्याचे कारण त्यांनी सांगितले.

Wayanad landslides ( Marathi News ) : केरळमधील वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या घटनेत आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अनेकजण बेपत्ता असून आहेत. अजुनही या ठिकाणी मदत मोहिम सुरूच आहे, गेल्या काही दिवसापासून वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. दरम्यान, आता वायनाडमधील वाढता पाऊस आणि भूस्खलनासारख्या घटना का घडत आहेत यावर एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी भाष्य केले आहे. या घटनांमागील कारणही त्यांनी सांगितले आहेत. 

केरळमध्ये सुरू असलेला अधिक पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना याचे कारण अरबी समुद्रातील वाढते तापमान असल्याचे कारण त्यांनी सांगितले. 

वरिष्ठ शास्त्रज्ञ एस अभिलाष यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या सगळ्यांची कारणे सांगितली आहेत. एस अभिलाष हे कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वातावरणीय रडार संशोधन केंद्राचे संचालक आहेत. ते म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांपासून कासारगोड, कन्नूर, वायनाड, कालिकत आणि मलप्पुरम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

'२०१९ मध्ये असेच ढग तयार झाले होते'

" गेल्या दोन आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. यामुळे माती जड झाली. २९ जुलै रोजी अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ खोल 'मेसोस्केल क्लाउड सिस्टिम' तयार झाली होती. यामुळे मुसळधार पाऊस झाला आणि नंतर भूस्खलन झाले. २०१९ मध्ये केरळमध्ये पूर आला होता त्यावेळीही असेच ढग तयार झाले होते. काहीवेळा असं किनाऱ्याकडे होतं. २०१९ मध्येही असेच घडले होते. 'दक्षिण-पूर्व अरबी समुद्र गरम होत आहे, यामुळे केरळसह या भागातील वातावरण अस्थिर होत आहे,असं आमच्या संशोधनात असे आढळून आले आहे, असंही वरिष्ठ शास्त्रज्ञ एस अभिलाष म्हणाले. 

कर्नाटक, कोकणातही परिणाम

एस अभिलाष यांनी सांगितले की, हा बदल हवामान बदलाशी देखील संबंधित आहे. पूर्वी असा पाऊस मंगळुरू जवळील ‘उत्तर कोकण पट्ट्यात’ अधिक प्रमाणात होत होता. २०२२ मध्ये, अभिलाष आणि इतर शास्त्रज्ञांचे संशोधन हवामान आणि वातावरणीय विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानुसार, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस अधिक वेगाने सरकतो. अभिलाष आणि आयआयटीएम आणि आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी २०२१ मध्ये एल्सेव्हियरमध्ये प्रकाशित केलेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोकण प्रदेशातील अतिवृष्टीचे एक हॉटस्पॉट दक्षिणेकडे सरकले आहे. ज्याचे संभाव्य परिणाम घातक असू शकतात.

भारतीय हवामान विभाग हवामान केंद्रांनी त्रिशूर, पलक्कड, कोझिकोड, वायनाड, कन्नूर, मलप्पुरम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये १९ सेमी ते ३५ सेमी दरम्यान पावसाची नोंद केली आहे. 

केरळसह महाराष्ट्रातही कमी वेळात जास्त पाऊस

हवामान विभागाने १ ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला. केरळमधील काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे, मान्सूनची पद्धत अनियमित झाली आहे आणि कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे केरळपासून महाराष्ट्रापर्यंतच्या पश्चिम घाटात दरड कोसळण्याच्या आणि पुराच्या घटना वारंवार घडत आहेत.

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्रmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस