शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

तामिळनाडूमध्ये पावसाचा कहर, 15 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 11:03 IST

तामिळनाडू आणि पदुच्चेरीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.

ठळक मुद्देतामिळनाडू आणि पदुच्चेरीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे.

चेन्नई  - तामिळनाडू आणि पदुच्चेरीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. तामिळनाडूच्या कोईंबत्तूरमध्ये मुसळधार पावसामुळे घरावर भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत तामिळनाडू सरकारच्यावतीने करण्यात येणार आहे. हवामान खात्याने काही दिवस या भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील नादूर कन्नपमध्ये सोमवारी (2 डिसेंबर) सकाळी भिंत कोसळून तीन घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत तामिळनाडू सरकारच्यावतीने करण्यात येणार आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयं हे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

चेन्नईच्या हवामान विभागाने नागरिकांना सतर्क केले आहे. थिरुवल्लूर, वेल्लोर, थिरुवन्नामलाई, थुटीकुडी, रामनाथपूरम आणि तिरूनेलवेली या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसामुळे येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  देशासह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनचा तडाखा नागरिकांना बसला आहे. भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 2391 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मान्सूनमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 2391 जणांना जीव गमवावा लागला. यंदा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकसभेत मंगळवारी (19 नोव्हेंबर) याबाबत माहिती देण्यात आली.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मान्सूनमुळे देशातील 2391 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर आठ लाखांपेक्षाही अधिक घरांची हानी झाली असल्याची  माहिती दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) 176 पथकांनी 98,962 नागरिकांची सुटका केली आणि देशातील 23,869 नागरिकांना वैद्यकीय मदत करण्यात आल्याची माहिती राय यांनी दिली. पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे 15,729 जनावरे बेपत्ता झाली आणि 63,975 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला. तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती देण्यात आली.

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूRainपाऊसDeathमृत्यू