शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ना घर मिला ना घरवाली! पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेऊन ११ महिला बॉयफ्रेंडसोबत पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:32 IST

काही महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेतल्यावर असं काही केलं जे समजल्यावर उत्तर प्रदेश सरकारही हैराण झालं आहे.

प्रत्येक गरीब व्यक्तीच्या डोक्यावर छत असावं, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. पण काही लोकांनी किंवा अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या पैशांचा गैरवापर केल्याच्याही घटना घडल्या आहे. पण उत्तर प्रदेशात एक अजब घटना समोर आली आहे. 

काही महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेतल्यावर असं काही केलं जे समजल्यावर उत्तर प्रदेश सरकारही हैराण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील 11 महिला पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे घेऊन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या. हे अनोखं प्रकरण असून संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. प्रशासनासोबतच ही घटना सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या लोकांच्या पत्नी पैसे घेऊन बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या आहेत, त्यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. अडचण अशी आहे की, या लोकांना घर बांधण्यासाठी मिळणारा पहिला हप्ता घेऊन महिला पळून गेल्या, आता प्रशासनाने त्यांचा दुसरा हप्ताही थांबवला आहे. आता हे लोक अशा अवस्थेत सापडले आहेत की त्यांना ना घर मिळत आहे ना बायको.

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील सुमारे २,३५० लोकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पैसे मिळाले आहेत. यातील बहुतांश लाभार्थी महाराजगंजमधील ठूठीबारी, शितलपूर, चटिया, रामनगर, बकुल डीहा, खसरा, किशूनपूर आणि मेधौली गावातील आहेत. यातील अनेक घरांचं बांधकाम पूर्ण झालं आहे.

दोन हजार लाभार्थ्यांपैकी सुमारे ११ महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचा ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन आपल्या नवऱ्यांना सोडल्याची माहिती मिळत आहे. या महिलांनी पैसे घेऊन बॉयफ्रेंडसह पळ काढला. पंतप्रधान योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायमस्वरूपी घरं बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीनुसार निधीचे वाटप केले जाते. 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नMONEYपैसा