शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

राजस्थानमधील रुग्णालयात महिनाभरात 100 नवजात बालकांचा मृत्यू, राजकारण तापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:51 IST

राजस्थानमधील रुग्णालयात महिनाभरात झालेल्या 100 बालमृत्यूंवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे.

कोटा - राजस्थानमधील कोटा येथील जेके. लोन रुग्णालयात सातत्याने बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये 9 अजून मुलांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे डिसेंबरपासून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 100 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान या बालमृत्यूंवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने या मुद्द्यावरून राजस्थान सरकार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'एका महिन्यात 100 मुलांचा मृत्यू  होणे ही प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करण्याइतपत सामान्य बाब नाही, असा संताप भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. तर बीएसपी प्रमुख मायावती यांनीही बालमृत्यूवरून गहलोत सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली आहे.  दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये सुद्धा या रुग्णालयात 77 मुलांचा मृत्यू झाला होता. असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. ''30 डिसेंबर रोजी रुग्णालयात 4 मुलांचा मृत्यू झाला होता. तर 31 डिसेंबर रोजी 5 मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचा मृत्यू कमी वजनामुळे झाला आहे.''असे या रुग्णालयाचे सुपिरिटेंडेंट डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले. मुलांचा मृत्यूनंतर भाजपाने गहलोत सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुथ अमित मालवीय यांनीही या प्रकारावरून काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. एका महिन्यात 100 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे, मात्र राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना कुणी साधा प्रश्नही विचारत नाही. कोटा हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी येऊ शकत नाहीत एवढ्या दूर नाही. तसेच ही घटना एवढी किरकोळ नाही मात्र काँग्रेस सरकारच्या बेफिकिरीकडे प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका मालविय यांनी केली आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा