शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

राजस्थानमधील रुग्णालयात महिनाभरात 100 नवजात बालकांचा मृत्यू, राजकारण तापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:51 IST

राजस्थानमधील रुग्णालयात महिनाभरात झालेल्या 100 बालमृत्यूंवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे.

कोटा - राजस्थानमधील कोटा येथील जेके. लोन रुग्णालयात सातत्याने बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये 9 अजून मुलांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे डिसेंबरपासून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 100 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान या बालमृत्यूंवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने या मुद्द्यावरून राजस्थान सरकार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'एका महिन्यात 100 मुलांचा मृत्यू  होणे ही प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करण्याइतपत सामान्य बाब नाही, असा संताप भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. तर बीएसपी प्रमुख मायावती यांनीही बालमृत्यूवरून गहलोत सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली आहे.  दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये सुद्धा या रुग्णालयात 77 मुलांचा मृत्यू झाला होता. असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. ''30 डिसेंबर रोजी रुग्णालयात 4 मुलांचा मृत्यू झाला होता. तर 31 डिसेंबर रोजी 5 मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचा मृत्यू कमी वजनामुळे झाला आहे.''असे या रुग्णालयाचे सुपिरिटेंडेंट डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले. मुलांचा मृत्यूनंतर भाजपाने गहलोत सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुथ अमित मालवीय यांनीही या प्रकारावरून काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. एका महिन्यात 100 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे, मात्र राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना कुणी साधा प्रश्नही विचारत नाही. कोटा हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी येऊ शकत नाहीत एवढ्या दूर नाही. तसेच ही घटना एवढी किरकोळ नाही मात्र काँग्रेस सरकारच्या बेफिकिरीकडे प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका मालविय यांनी केली आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा