शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्नाटकात १० बंडखोरांना मंत्रीपदे; भाजपाचे तीन जण कमालीचे नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 05:39 IST

काँग्रेस-जनता दलाचे (एस) आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यावर ते अपात्र ठरले गे

बंगळुरू : काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांचे सरकार खाली खेचण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दहा बंडखोरांना मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी गुरुवारी कॅबिनेट मंत्रीपदे दिली. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे मूळ भाजपच्या नेत्यांमध्ये असमाधान निर्माण झाले आहे. पक्षश्रेष्ठींकडे पक्षातील जुने अनेक जण मंत्रीपदासाठी प्रयत्न करीत असताना पक्षनेतृत्वाने त्यांची नाराजी दूर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

काँग्रेस-जनता दलाचे (एस) आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यावर ते अपात्र ठरले गेले. नंतर या आमदारांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेली विधानसभा पोटनिवडणूकही जिंकली. राजभवनवर साध्या समारंभात या आमदारांना राज्यपाल वजूभाई वाला यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. या नव्या मंत्र्यांची नावे अशी- एस.टी. सोमशेखर (यशवंतपूर मतदारसंघ), रमेश जारकिहोली (गोकाक), आनंद सिंह (विजयनगर), के. सुधाकर (चिक्कबल्लापूर), बी. बसवराज (के.आर. पुरम), ए. शिवाराम हेब्बर (येल्लापूर), बी.सी. पाटील (हिरेकेरूर), के. गोपालय्य (महालक्ष्मी लेआऊट), के.सी. नारायण गौडा (के.आर. पेट) आणि श्रीमंत बाळासाहेब पाटील (केगवाड).

बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तारामुळे मंत्रिमंडळात २८ मंत्री झाले आहेत व सहा जागा रिक्त आहेत. येदियुरप्पा यांनी रविवारी गुरुवारी शपथ घेतलेल्या १० जणांसह एकूण १३ इच्छुकांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, असे जाहीर केले होते. तीन जण भाजपचे आहेत. उमेश कट्टी, अरविंद लिंबावली आणि सी.पी. योगेश्वर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. भाजपमधील एका गटाने योगेश्वर यांना ते विधानसभेची निवडणूक हरले असून, विधिमंडळाचे सदस्य नाहीत, असे सांगून मंत्री बनवण्यास विरोध केला होता.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पा