शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा : नाशिकमध्ये विद्यार्थी सांसद परिषदेत उमटला सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:06 IST

कलेचा वारसा हा अनुवांशिक असतो. आजोबांपासून आमच्या घरात क लेचा वारसा चालत आला. बालपणीच कलेचे बालकडू मिळाल्याने शिक्षकीपेशात रमू शकलो नाही.

ठळक मुद्दे ‘मी आणि माझी कारकीर्द’ या विषयावर मान्यवरांनी मुक्त संवाद साधला ‘नाशिक व्हिजन-२०१८’चे

नाशिक : जीवनात परिश्रम करताना सातत्य हवे; मात्र त्यासोबत निष्ठा व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास ध्येय साध्य करणे अधिक सोपे होते. आपण करत असलेल्या कार्याचे स्वत: अवलोकन करून त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून जीवनाच्या यशोमार्गातील अडथळ्यांवर मात करता येईल, असा सूर विद्यार्थी सांसद परिषदेतून उमटला.निमित्त होते, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित ‘नाशिक व्हिजन-२०१८’चे. गुरुवारी (दि.४) विश्वास लॉन्स येथे पार पडलेल्या या परिषदेत ‘मी आणि माझी कारकीर्द’ या विषयावर मान्यवरांनी मुक्त संवाद साधला. प्रमुख वक्ते म्हणून अभिनेता राहुल सोलापूरकर, वैभव मांगले, कवी संदीप खरे, युवा उद्योजक मकरंद पाटील, मराठी चित्रपटसृष्टीचे जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे उपस्थित होते.दरम्यान, आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडताना खरे म्हणाले, आयुष्य सोपं-अवघड या दोन गोष्टींचे मिश्रण असते. आपल्या आयुष्याकडे आपण कसे बघतो, ते जास्त महत्त्वाचे आहे. मला परीक्षेच्या कालावधीत चौथीला असताना पहिल्यांदा कविता सुचली. पुढे कविता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली. श्याम पाडेकर यांनी वक्त्यांशी संवाद साधला. प्रारंभी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार व विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कलेचा वारसा हा अनुवांशिक असतो. आजोबांपासून आमच्या घरात क लेचा वारसा चालत आला. कलेचे बालकडू मिळाल्याने शिक्षकीपेशात रमू शकलो नाही. कलेचा प्रवास करताना मुंबईत पोहचलो. विविध चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी लाभली. या प्रवासात वैयक्तिक शिस्तीला मी महत्त्व दिले व हा गुण दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याकडून मला शिक ण्यास मिळाला. शिस्तीचा प्रभाव माझ्या विचारांवर झाल्याने मी कार्याला न्याय देऊ शकलो.- वैभव मांगले, अभिनेताशालेय स्नेहसंमेलनातील अनुभव मला खूप काही शिकवून गेला. प्रथमच मी शाळेच्या रंगमंचावर श्रीकृष्णाची भूमिका साकारली; मात्र हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता तसा तो तसा भयानकही होता. आपण स्वीकारलेल्या भूमिकेतून शक्यतो कधीही बाहेर पडू नये, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हा मूलमंत्र मला त्यावेळी शाळेच्या रंगमंचावरून मिळाला.- राहुल सोलापूरकर, अभिनेता

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसStudentविद्यार्थीvaibhav mangleवैभव मांगले