शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक वन दिन विशेष! नाशिकच्या राखीव जंगलांना सर्रास लावला जातोय ‘सुरुंग’

By अझहर शेख | Updated: March 21, 2023 16:55 IST

वन संरक्षणाचे मोठे आव्हान, जिल्ह्यात एकेकाळी घनदाट जंगले अस्तित्वात होती; दंडकारण्य म्हणून नाशिक ओळखले जात होते; मात्र काळाच्या ओघात नाशिककरांनी हे सर्व गमावून टाकले आहे,  

नाशिक - शहरासह जिल्ह्यातील राखीव वनांच्या जमिनी दिवसेंदिवस धोक्यात येत आहेत. उघड्या दिसणाऱ्या वनजमिनींवर वाढते अतिक्रमण आणि वनजमिनींचा गैरव्यवहार मागील काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. नांदगाव, पांझण आणि मालेगावमध्ये वनजमिनींवर सोलरचे मोठे प्रकल्प उभे राहिल्याचा धक्कादायक प्रकार वनखात्याने काही आठवड्यांपूर्वी उघडकीस आणला होता. यामुळे ‘जागतिक वन दिन’ दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जात असला तरी हा दिवस केवळ कागदोपत्रीच उरला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात एकेकाळी घनदाट जंगले अस्तित्वात होती; दंडकारण्य म्हणून नाशिक ओळखले जात होते; मात्र काळाच्या ओघात नाशिककरांनी हे सर्व गमावून टाकले आहे, हे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालातूनही गेल्या वर्षी स्पष्ट झाले आहे. नाशिकच्या वनांचे घटते प्रमाण व अहवालातील टक्केवारी चिंताजनक असली तरी वन संरक्षणाबाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींमध्येही गांभीर्य दिसून येत नसल्याची खंत निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी वन दिनाच्या पूर्वसंध्येला बोलून दाखविली. नाशिकच्या सभोवतालपासून महामार्गांचा विकास केला जात आहे. समृद्धी व नाशिक सुरत ग्रीन फिल्ड महामार्गांसारख्या प्रकल्पामुळे वनांचा ऱ्हास अटळ आहे. वनजमिनीही अधिग्रहीत केल्या जात आहे. यामुळे वनांचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे.

वनांची अवस्था ‘दीन’

जिल्ह्यातील पूर्व भागातील नांदगाव, मालेगावसारख्या तालुक्यांसह त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्येही काही राखीव वनांच्या जागेवर व्यावसायिकांकडून अतिक्रमण करण्यात आल्याचे समोर आले. एकूणच वनजमिनींना चोहोबाजूंनी सुरुंग लावला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे वनांची अवस्था ‘दीन’ झाली असून, त्याचा परिणाम पर्यावरणासह हवामानावरही होताना दिसत आहे. परिणामी, नागरिकांनाही बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत असून, अवकाळी पावसाचे अस्मानी संकटदेखील त्याचाच एक भाग असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

‘रिसॉर्ट ट्रेंड’ ठरतोय घातक

नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, दिंडोरी यांसारख्या तालुक्यांमध्ये मागील काही वर्षांपासून ‘रिसॉर्ट ट्रेंड’ वेगाने फोफावत चालले आहे. निसर्गाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे; मात्र या ट्रेंडमुळे या जबाबदारीचा कुठेतरी विसर पडल्याचे दिसते. ‘सेकेंड होम’ संकल्पनेनुसार फार्म हाऊस असो किंवा ‘रिसॉर्ट’चा व्यवसाय करताना स्थानिक जैवविविधता नैसर्गिक परिसंस्थेला धक्का लागणार नाही, यासाठी कोणीही खबरदारी घेताना दिसत नाही. यामुळे तेथील वनांसह जलस्त्रोत, वृक्षसंपदेचा ऱ्हास वाढत चालला आहे.

बिबट्याचे वाढले हल्ले!

वनांचा होणाऱ्या ऱ्हासामुळे बिबट्यासारख्या वन्यप्राणी सैरभैर होत असून अलीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याचे मानवी हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे. बिबट्या, तरस, कोल्हे, लांडगे आदी वन्यप्राण्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष वाढू लागल्याने त्याचा धोका मानवालाही होताना दिसत आहे. मानवाने त्यांच्या घरात चालविलेला हस्तक्षेप वन्यप्राण्यांना लोकवस्तीकडे येण्यास प्रवृत्त करत असल्याचे वन्यजीवप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे.

...आता जंगल उरले अवघे ६ टक्के!

१) जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र- १५,५३० किमी.२) वनाच्छादनाचे क्षेत्र- ६.९५ टक्के

३) घनदाट जंगल - ०.०० टक्के४) मध्यम वनाच्छादन- ३४६ किमी

५) खुरटे (खुले) वन क्षेत्र- ७३३ किमी(वन सर्वे ऑफ इंडिया रिपोर्ट : २०२१) 

टॅग्स :forestजंगल