शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

महिला बचत गटांनी तयार केले ५० हजार मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 4:46 PM

नाशिक जिल्ह्यात २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन करण्यात आले असून, सर्व प्रकारचे उद्योग, धंदे, व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत गरीब व हातमजुरी करणा-या नागरिकांचे हाल होत असले तरी, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत

ठळक मुद्देजि.प.चा पुढाकार : लॉकडाउनमध्ये रोजगार निर्मिती प्रत्येकाला मास्क वापरण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात येऊन उद्योगधंदे, रोजगार निर्मिती बंद झालेली असताना नाशिक जिल्हा परिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या मास्कचा तुटवडा भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना प्रोत्साहित केले आहे. गेल्या आठ दिवसांत महिला बचत गटांनी ५० हजार मास्कची निर्मिती करण्याबरोबरच घरच्या घरी रोजगार निर्मितीला हातभार लावला आहे.

नाशिक जिल्ह्यात २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन करण्यात आले असून, सर्व प्रकारचे उद्योग, धंदे, व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत गरीब व हातमजुरी करणा-या नागरिकांचे हाल होत असले तरी, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थाही बाधित झाली आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांना विविध उपाययोजना सुचविण्यात येत असताना त्यात प्रत्येकाला मास्क वापरण्याची सूचना करण्यात आलेली आहे. परंतु रुग्णालये, औषधी दुकानांमध्ये मास्कचा तुटवडा भासत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागातील महिला बचत गटांनाच त्यासाठ प्रोत्साहित केले आहे. मास्कची निर्मिती करून ती प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींना वितरीत करून नागरिकांमध्ये मास्कची उपयोगीता व बचत गटांना रोजगाराची सोय त्यामुळे निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांत ३२ गटांच्या माध्यमातून सुमारे ५० हजारांहून अधिक कापडी मास्क तयार करण्यात आले असून, त्यातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गरज भागविली जात आहे. मास्कला असलेली मागणी पाहता गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बचत गटांशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या आहेत.चौकट===आशा, अंगणवाडी सेविकांकडून जनजागृतीकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच ग्रामीण भागात जनजागृतीसाठी आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले जात असून, त्यात प्रामुख्याने हात स्वच्छ धुणे, गर्दीपासून दूर राहणे आदी बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींनीदेखील याकामी पुढाकार घेतला असून, आठवडे बाजाराऐवजी दररोज गावातील एका व्यक्तीला भाजीपाला विक्रीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी

 

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद