शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

शंभर आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढणार :  विनोद तावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:49 IST

नॉन इंग्रजी शाळांमध्ये १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, पुढील महिन्यात यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा नंदुरबारला सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, या निर्णयामुळे मराठी शाळांची जगाच्या नकाशावर एक आगळीवेगळी ओळख निर्माण होणार असल्याचा विश्वास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देपहिली आंतरराष्ट्रीय शाळा नंदुरबारलामुक्त विद्यापीठात शतायुषी संस्था संवादइच्छुक संस्थांनी पुढाकार घ्यावा

सातपूर : नॉन इंग्रजी शाळांमध्ये १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, पुढील महिन्यात यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा नंदुरबारला सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, या निर्णयामुळे मराठी शाळांची जगाच्या नकाशावर एक आगळीवेगळी ओळख निर्माण होणार असल्याचा विश्वास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोलताना व्यक्त केला.   नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मुक्त विद्यापीठात आयोजित शतायुषी संस्था संवाद संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिक्षणमंत्री तावडे यांनी पुढे सांगितले की, १०० वर्षे शिक्षण संस्था चालविणे सोपे नाही आणि १०० वर्षांपूर्वी शिक्षण संस्था काढणे सोपे नव्हते. कारण शिक्षण हा उद्योग नाही. ज्या संस्था काही आगळेवेगळे चांगले काम करीत असतील त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार आहे. राज्यातील ११ खासगी संस्थांना विद्यापीठे दिली आहेत. त्याच धर्तीवर राज्यात मोठमोठी शिक्षण संस्था आहेत. त्यांना स्वत:चे एसएससी बोर्ड देण्याची शासनाची तयारी आहे. अशा इच्छुक संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्या कोणत्याही अनुदानात कपात केली जाणार नाही. राज्यात नॉन इंग्रजी शाळांमध्ये १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निर्णयामुळे मराठी शाळांची जगाच्या नकाशावर एक आगळीवेगळी ओळख निर्माण होणार असल्याचा ठाम विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. शासनाने लोकसहभागातून ३२२ कोटी रु पये जमा केलेले आहेत. त्यातून डिजिटल शाळा उभारण्यात येणार आहेत. यात धुळे आणि नंदुरबार अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, शिक्षणतज्ज्ञ सुमन करंदीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ई. वायुनंदन, संस्थेचे सेक्रे टरी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्यासह महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, सुनील बागुल, नीलिमा पवार आदींसह १०० वर्षे पूर्ण झालेल्या राज्यातील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्यास मनाईविविध शालेय उपक्र मात शिक्षक विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणतात. विविध प्रभात फेºया,दिंड्या, जनजागृती कार्यक्र म आणि तत्सम उपक्र मांसाठी विद्यार्थ्यांना उठसूठ गावभर फिरविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. असा निर्णय परस्पर घेतला जातो. यापुढे शिक्षण संचालकांच्या परवानगी किंवा शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणू नये, असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.शिक्षक भरतीचे केंद्रीयकरणराज्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या भरतीचे केंद्रीकरण (सेंट्रलाइज) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिनाभरात दोन लाखांच्यावर अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यातून शिक्षकांची निवड केली जाईल. ज्या संस्थांना शिक्षक भरती करायची असेल त्यांनी शासनाने निवड केलेल्या शिक्षकांचीच निवड करायची असून, निवड करण्याचा अधिकार संस्थांना देण्यात आला आहे, अशीही माहिती तावडे यांनी दिली.शिक्षकांना शाळाबाह्ण काम देऊ नयेशिक्षकांना शाळाबाह्ण काम देऊ नये, अशी मागणी शिक्षक संघटनांची. शासनालाही ही मागणी मान्य आहे. परंतु हे काम गेल्या २५ ते ३० वर्षांपासून चालू आहे. त्यावेळी कोणीही मागणी केली नव्हती. आता आमच्याकडे ही मागणी करण्यात येत आहे. याबाबत पुढील महिन्यात शिक्षक संघटना, त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यी यांच्याबरोबर निवडणूक आयोगाकडे जाऊन विनंती करणार आहोत, असेही तावडे यांनी सांगितले. शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये, ही मागणी शिक्षक संघटनांची. शासनालाही ती मान्य आहे; परंतु हे काम गेल्या २५ ते ३० वर्षांपासून चालू आहे. त्यावेळी कोणीही मागणी केली नव्हती. आता आमच्याकडे ही मागणी करण्यात येत आहे. याबाबत पुढील महिन्यात शिक्षक संघटना, त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर निवडणूक आयोगाकडे जाऊन विनंती करणार आहोत, असेही तावडे यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा