शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

का वाढतंय  नाशिकचं तपमान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:44 IST

गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश से.पर्यंत असह्य तपमानाशी सर्वांनाच सामना करावा लागत आहे. विशेषत: उत्तर ...

गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश से.पर्यंत असह्य तपमानाशी सर्वांनाच सामना करावा लागत आहे. विशेषत: उत्तर महाराष्टतील सर्वाधिक थंड ठिकाण असलेल्या नाशिकमध्ये इतके तपमान कधीच नव्हते, असा अनुभव नागरिक सांगतात. यंदा तर मे ऐवजी एप्रिल महिन्यातच पारा चाळिशीपर्यंत पोहोचला होता.  ४०-५० वर्षांपूर्वीचे नाशिक हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. म्हणूनच देवळाली येथे आर्टिलरी सेंटर सुरू केले होते. नाशिकच्या अवतीभवती जंगलं होती. नाशिकची लोकसंख्या मर्यादित होती. लोकसंख्या झपाट्याने वाढली.  नगरपालिकेची महानगरपालिका झाली. झपाट्याने शहराचा विकास झाला. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले. दोन औद्योगिक वसाहती सुरू झाल्या. प्रदूषणाचे प्रमाण वाढले. शहराचा लोकसंख्या वाढीमुळे विस्तार झाला. शेतजमिनीत सीमेंटची जंगलं झपाट्याने वाढत आहेत. प्रदूषण कमालीचे वाढले. लोकांचे राहणीमान वाढले. या सर्व बदलत्या जीवनशैलीमुळे नाशिक शहराचे तपमान वाढू लागले आहे.- प्राचार्य डॉ. किशोर पवारनाशिक शहर तसे खूपही मोठे नाही, परंतु मोटारींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सायकल वापरणारी माणसं स्वयंचलित दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात वापरू लागले. पेट्रोल, डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाचा भरमसाठ वापर सुरू झाला. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण सुरू झाले. कार्बनडाय आॅक्साईड वायूचे प्रमाण पर्यावरणात कित्येक पटीने वाढले. त्याबरोबरच कार्बन मोनाक्साईड वायू, धूळ, धूर नायट्रोजन डायआॅक्साईड वायू यांसारख्या विषारी वायूंचे प्रमाण हवेत वाढले. तपमान वाढीला प्रामुख्याने कार्बनडाय आॅक्साईड वायू हा हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. त्याचप्रमाणे ४० टक्क्याने वाढले. वनांच्या ºहासामुळे हा अतिरिक्त कार्बनडाय आॅक्साईड वायू वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी शोषून घेऊ शकत नाही. सूर्यापासून येणारी उष्णता पृथ्वीवर येऊन पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. ही उष्णता वातावरणात कार्बनडाय आॅक्साईडमुळे उत्सर्जित होत नाही. हा वायू काचेसारखे काम करतो. त्यामुळे भूतलावरील उष्णता रोखून धरली जाते.सीमेंटच्या इमारती...सूर्याच्या उष्णतेमुळे सीमेंटच्या इमारती मोठ्या प्रमाणात तापतात. रात्री त्या वातावरणात उष्णता सोडतात. त्यामुळे तपमान वाढते. आता नाशिकमध्ये मुंबई, सिंगापूर यांसारख्या अनेक मजली इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे ही समस्या कित्येक पटीने वाढत आहे. आज मोठ्या प्रमाणात चार पदरी, सहा पदरी महामार्ग होत आहेत. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणीसाठी डांबर, काँक्रीट वापरले जाते. काळा रंग उष्णता अधिक शोषतो. त्यामुळे हे रस्ते खूप तापतात व रात्री उष्णता उत्सर्जित करतात. असे रस्ते लवकर थंड होत नाही. पर्यायाने तपमान वाढते. वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कुलरदेखील थिटे पडतात.

 

टॅग्स :environmentवातावरण