शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

का वाढतंय  नाशिकचं तपमान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:44 IST

गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश से.पर्यंत असह्य तपमानाशी सर्वांनाच सामना करावा लागत आहे. विशेषत: उत्तर ...

गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश से.पर्यंत असह्य तपमानाशी सर्वांनाच सामना करावा लागत आहे. विशेषत: उत्तर महाराष्टतील सर्वाधिक थंड ठिकाण असलेल्या नाशिकमध्ये इतके तपमान कधीच नव्हते, असा अनुभव नागरिक सांगतात. यंदा तर मे ऐवजी एप्रिल महिन्यातच पारा चाळिशीपर्यंत पोहोचला होता.  ४०-५० वर्षांपूर्वीचे नाशिक हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. म्हणूनच देवळाली येथे आर्टिलरी सेंटर सुरू केले होते. नाशिकच्या अवतीभवती जंगलं होती. नाशिकची लोकसंख्या मर्यादित होती. लोकसंख्या झपाट्याने वाढली.  नगरपालिकेची महानगरपालिका झाली. झपाट्याने शहराचा विकास झाला. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले. दोन औद्योगिक वसाहती सुरू झाल्या. प्रदूषणाचे प्रमाण वाढले. शहराचा लोकसंख्या वाढीमुळे विस्तार झाला. शेतजमिनीत सीमेंटची जंगलं झपाट्याने वाढत आहेत. प्रदूषण कमालीचे वाढले. लोकांचे राहणीमान वाढले. या सर्व बदलत्या जीवनशैलीमुळे नाशिक शहराचे तपमान वाढू लागले आहे.- प्राचार्य डॉ. किशोर पवारनाशिक शहर तसे खूपही मोठे नाही, परंतु मोटारींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सायकल वापरणारी माणसं स्वयंचलित दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात वापरू लागले. पेट्रोल, डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाचा भरमसाठ वापर सुरू झाला. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण सुरू झाले. कार्बनडाय आॅक्साईड वायूचे प्रमाण पर्यावरणात कित्येक पटीने वाढले. त्याबरोबरच कार्बन मोनाक्साईड वायू, धूळ, धूर नायट्रोजन डायआॅक्साईड वायू यांसारख्या विषारी वायूंचे प्रमाण हवेत वाढले. तपमान वाढीला प्रामुख्याने कार्बनडाय आॅक्साईड वायू हा हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. त्याचप्रमाणे ४० टक्क्याने वाढले. वनांच्या ºहासामुळे हा अतिरिक्त कार्बनडाय आॅक्साईड वायू वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी शोषून घेऊ शकत नाही. सूर्यापासून येणारी उष्णता पृथ्वीवर येऊन पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. ही उष्णता वातावरणात कार्बनडाय आॅक्साईडमुळे उत्सर्जित होत नाही. हा वायू काचेसारखे काम करतो. त्यामुळे भूतलावरील उष्णता रोखून धरली जाते.सीमेंटच्या इमारती...सूर्याच्या उष्णतेमुळे सीमेंटच्या इमारती मोठ्या प्रमाणात तापतात. रात्री त्या वातावरणात उष्णता सोडतात. त्यामुळे तपमान वाढते. आता नाशिकमध्ये मुंबई, सिंगापूर यांसारख्या अनेक मजली इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे ही समस्या कित्येक पटीने वाढत आहे. आज मोठ्या प्रमाणात चार पदरी, सहा पदरी महामार्ग होत आहेत. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणीसाठी डांबर, काँक्रीट वापरले जाते. काळा रंग उष्णता अधिक शोषतो. त्यामुळे हे रस्ते खूप तापतात व रात्री उष्णता उत्सर्जित करतात. असे रस्ते लवकर थंड होत नाही. पर्यायाने तपमान वाढते. वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कुलरदेखील थिटे पडतात.

 

टॅग्स :environmentवातावरण