शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

का वाढतंय  नाशिकचं तपमान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:44 IST

गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश से.पर्यंत असह्य तपमानाशी सर्वांनाच सामना करावा लागत आहे. विशेषत: उत्तर ...

गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश से.पर्यंत असह्य तपमानाशी सर्वांनाच सामना करावा लागत आहे. विशेषत: उत्तर महाराष्टतील सर्वाधिक थंड ठिकाण असलेल्या नाशिकमध्ये इतके तपमान कधीच नव्हते, असा अनुभव नागरिक सांगतात. यंदा तर मे ऐवजी एप्रिल महिन्यातच पारा चाळिशीपर्यंत पोहोचला होता.  ४०-५० वर्षांपूर्वीचे नाशिक हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. म्हणूनच देवळाली येथे आर्टिलरी सेंटर सुरू केले होते. नाशिकच्या अवतीभवती जंगलं होती. नाशिकची लोकसंख्या मर्यादित होती. लोकसंख्या झपाट्याने वाढली.  नगरपालिकेची महानगरपालिका झाली. झपाट्याने शहराचा विकास झाला. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले. दोन औद्योगिक वसाहती सुरू झाल्या. प्रदूषणाचे प्रमाण वाढले. शहराचा लोकसंख्या वाढीमुळे विस्तार झाला. शेतजमिनीत सीमेंटची जंगलं झपाट्याने वाढत आहेत. प्रदूषण कमालीचे वाढले. लोकांचे राहणीमान वाढले. या सर्व बदलत्या जीवनशैलीमुळे नाशिक शहराचे तपमान वाढू लागले आहे.- प्राचार्य डॉ. किशोर पवारनाशिक शहर तसे खूपही मोठे नाही, परंतु मोटारींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सायकल वापरणारी माणसं स्वयंचलित दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात वापरू लागले. पेट्रोल, डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाचा भरमसाठ वापर सुरू झाला. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण सुरू झाले. कार्बनडाय आॅक्साईड वायूचे प्रमाण पर्यावरणात कित्येक पटीने वाढले. त्याबरोबरच कार्बन मोनाक्साईड वायू, धूळ, धूर नायट्रोजन डायआॅक्साईड वायू यांसारख्या विषारी वायूंचे प्रमाण हवेत वाढले. तपमान वाढीला प्रामुख्याने कार्बनडाय आॅक्साईड वायू हा हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. त्याचप्रमाणे ४० टक्क्याने वाढले. वनांच्या ºहासामुळे हा अतिरिक्त कार्बनडाय आॅक्साईड वायू वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी शोषून घेऊ शकत नाही. सूर्यापासून येणारी उष्णता पृथ्वीवर येऊन पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. ही उष्णता वातावरणात कार्बनडाय आॅक्साईडमुळे उत्सर्जित होत नाही. हा वायू काचेसारखे काम करतो. त्यामुळे भूतलावरील उष्णता रोखून धरली जाते.सीमेंटच्या इमारती...सूर्याच्या उष्णतेमुळे सीमेंटच्या इमारती मोठ्या प्रमाणात तापतात. रात्री त्या वातावरणात उष्णता सोडतात. त्यामुळे तपमान वाढते. आता नाशिकमध्ये मुंबई, सिंगापूर यांसारख्या अनेक मजली इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे ही समस्या कित्येक पटीने वाढत आहे. आज मोठ्या प्रमाणात चार पदरी, सहा पदरी महामार्ग होत आहेत. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणीसाठी डांबर, काँक्रीट वापरले जाते. काळा रंग उष्णता अधिक शोषतो. त्यामुळे हे रस्ते खूप तापतात व रात्री उष्णता उत्सर्जित करतात. असे रस्ते लवकर थंड होत नाही. पर्यायाने तपमान वाढते. वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कुलरदेखील थिटे पडतात.

 

टॅग्स :environmentवातावरण