शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नाशिक कोरोनाचा हॉट स्पॉट झाल्यास जबाबदारी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 23:03 IST

नाशिक मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत या बाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहरात होणारी घुसखोरी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे अशा घुसखोरांमुळे नाशिक कोरोना बाधीतांचे हॉट स्पॉट ठरले तर जबाबदारी कोणाची अस प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवाढती घुसखोरी चिंता वाढविणारीयंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा 

संजय पाठक, नाशिक : कोरोनाचा भयंकर संसर्ग टाळण्यासाठी महिनाभर देशभर लॉक डाऊन होता.  आता कुठे नाशिक शहरात सर्व काही सुरळीत होईल, असे वाटत असताना नाशिक शहरातही कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत याबाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहरात होणारी घुसखोरी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे अशा घुसखोरांमुळे नाशिक कोरोना बाधीतांचे हॉट स्पॉट ठरले तर जबाबदारी कोणाची अस प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्य़ात सर्वाधिक स्फोटक परिस्थती मालेगावात आज निर्माणझाली. मात्र तत्पूर्वी पहिलाच रूग्ण निफाड मध्ये आढळला आणि त्यानंतर नाशिक शहरातील गोविंद नगर येथे पहिला रूग्ण आढळला होता. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोविंद नगर मधील त्या बाधीताच्या घरापासून तीन चौरस किलो मीटरचे क्षेत्र सील केले आणि ज्यया पध्दतीने तपासणी मोहिम राबविली. त्यातून शहरातील त्या भागात अधिक संसर्ग वाढला नाही. मात्र, त्यानंतर देखील दोन नाशिककरांना बाहेर प्रवास  केल्याने संसर्ग झाल्याचे आढळल्याने तेथे देखील पाचशे मीटर क्षेत्र सील करण्यातआले.परंतु त्यानंतर शहरात सिडकोतील अंबड लिंकरोडसह सर्वच ठिकाणी बाहेरून आलेल्यांनी आणि महापालिकेकडे वेळेत खबर न देणाऱ्यांनाच संसर्ग असल्याचे आढळले. दरम्यान, लॉक डाऊनचा पहिला टप्पा पार पडला. तस तसे शहरात बाहेरून चोरी छुपे नागरीक येऊ लागले. त्याची जाणिव झाल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी थेट सीआरपीएफ बोलविण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली. तीसाधार होती आणि महापौरांनी तसे पत्रात सोदाहरण नमूद केले होते. मात्र, ती किती योग्य आहे, ते शनिवारी (दि.२) एकाच दिवसात सहा रूग्ण आढळल्याने जाणवते. कोरोनाशी खऱ्या अर्थाने दोन हात करणारे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या टीमसह काम करण्यात कोणतीही कसर सोडली नाहीच. परंतु त्यांनीही हा धोकाओळखून पोलिसांना पत्र दिले आणि सर्वच मनपा हद्दीवर गस्त वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर देखील प्रश्न सुटला नाही हे स्पष्ट होत आहे. या आधी मानखुर्द येथून पायी चालत १२ सुरक्षा कामगार मनपा हद्दीत पोहोचले त्यातील एकाल कोरोना झाल्याचे आढळले. त्यावेळी देखील पोलीसांनी शहर जिल्हयाच्या सीमा सील केल्या असतानाही ते शहरात कसे काय घुसले हा प्रश्न होताच परंतु आजही हजारोे मजुर टप्प्याटप्पाने जात असताना त्यांनामहामार्गावर आणि अन्यत्रही कोठेही अटकाव होताना दिसत नाही. आता तर भडगाव येथुन दुधाच्य टॅँकरमध्ये बसून लपून आलेल्या एका रूग्णामुळे निर्बंध कोठे आहेत, असा प्रश्न पडतो.  मुळात जिल्हा शहरच्या सीमाच काय परंतु शहरात कुठेही फिरल्यानंतर मुख्यमार्ग आणि मुख्य भागातील बाजारपेठा वगळता सर्वच गर्दी जाणवत आहे. त्यामुळे काही  दिवसांपूर्वी बाहेर पडताना पोलिसांची वाटणारी भीतीही नष्ट झाली आहेत. अत्यावश्यक सेवा आणि मदतीच्या नावाखाली एनजीओंना दिलेल्या सवलतींचा खरोखरीच त्याच कामासाठी वापर होतोय का, मालवाहतूकीत माल कमी आणि नागरीकांची वाहतूक जास्त होतेय का, अशा सर्वच बाबतीत फेर आढाव्याची गरज आहे. शहर केवळ स्वच्छ आणि सुरक्षीत नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने देखील उत्तम राहीले पाहिजे, परंतु रूग्ण संख्या वाढत गेली आणि त्यातून नाशिककरांच्या जीवावर बेतले तर जबाबदारी कोण पत्कारणार? की टोलवा टोलवीच चालणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिस