शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नाशिक कोरोनाचा हॉट स्पॉट झाल्यास जबाबदारी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 23:03 IST

नाशिक मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत या बाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहरात होणारी घुसखोरी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे अशा घुसखोरांमुळे नाशिक कोरोना बाधीतांचे हॉट स्पॉट ठरले तर जबाबदारी कोणाची अस प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवाढती घुसखोरी चिंता वाढविणारीयंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा 

संजय पाठक, नाशिक : कोरोनाचा भयंकर संसर्ग टाळण्यासाठी महिनाभर देशभर लॉक डाऊन होता.  आता कुठे नाशिक शहरात सर्व काही सुरळीत होईल, असे वाटत असताना नाशिक शहरातही कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत याबाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहरात होणारी घुसखोरी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे अशा घुसखोरांमुळे नाशिक कोरोना बाधीतांचे हॉट स्पॉट ठरले तर जबाबदारी कोणाची अस प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्य़ात सर्वाधिक स्फोटक परिस्थती मालेगावात आज निर्माणझाली. मात्र तत्पूर्वी पहिलाच रूग्ण निफाड मध्ये आढळला आणि त्यानंतर नाशिक शहरातील गोविंद नगर येथे पहिला रूग्ण आढळला होता. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोविंद नगर मधील त्या बाधीताच्या घरापासून तीन चौरस किलो मीटरचे क्षेत्र सील केले आणि ज्यया पध्दतीने तपासणी मोहिम राबविली. त्यातून शहरातील त्या भागात अधिक संसर्ग वाढला नाही. मात्र, त्यानंतर देखील दोन नाशिककरांना बाहेर प्रवास  केल्याने संसर्ग झाल्याचे आढळल्याने तेथे देखील पाचशे मीटर क्षेत्र सील करण्यातआले.परंतु त्यानंतर शहरात सिडकोतील अंबड लिंकरोडसह सर्वच ठिकाणी बाहेरून आलेल्यांनी आणि महापालिकेकडे वेळेत खबर न देणाऱ्यांनाच संसर्ग असल्याचे आढळले. दरम्यान, लॉक डाऊनचा पहिला टप्पा पार पडला. तस तसे शहरात बाहेरून चोरी छुपे नागरीक येऊ लागले. त्याची जाणिव झाल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी थेट सीआरपीएफ बोलविण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली. तीसाधार होती आणि महापौरांनी तसे पत्रात सोदाहरण नमूद केले होते. मात्र, ती किती योग्य आहे, ते शनिवारी (दि.२) एकाच दिवसात सहा रूग्ण आढळल्याने जाणवते. कोरोनाशी खऱ्या अर्थाने दोन हात करणारे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या टीमसह काम करण्यात कोणतीही कसर सोडली नाहीच. परंतु त्यांनीही हा धोकाओळखून पोलिसांना पत्र दिले आणि सर्वच मनपा हद्दीवर गस्त वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर देखील प्रश्न सुटला नाही हे स्पष्ट होत आहे. या आधी मानखुर्द येथून पायी चालत १२ सुरक्षा कामगार मनपा हद्दीत पोहोचले त्यातील एकाल कोरोना झाल्याचे आढळले. त्यावेळी देखील पोलीसांनी शहर जिल्हयाच्या सीमा सील केल्या असतानाही ते शहरात कसे काय घुसले हा प्रश्न होताच परंतु आजही हजारोे मजुर टप्प्याटप्पाने जात असताना त्यांनामहामार्गावर आणि अन्यत्रही कोठेही अटकाव होताना दिसत नाही. आता तर भडगाव येथुन दुधाच्य टॅँकरमध्ये बसून लपून आलेल्या एका रूग्णामुळे निर्बंध कोठे आहेत, असा प्रश्न पडतो.  मुळात जिल्हा शहरच्या सीमाच काय परंतु शहरात कुठेही फिरल्यानंतर मुख्यमार्ग आणि मुख्य भागातील बाजारपेठा वगळता सर्वच गर्दी जाणवत आहे. त्यामुळे काही  दिवसांपूर्वी बाहेर पडताना पोलिसांची वाटणारी भीतीही नष्ट झाली आहेत. अत्यावश्यक सेवा आणि मदतीच्या नावाखाली एनजीओंना दिलेल्या सवलतींचा खरोखरीच त्याच कामासाठी वापर होतोय का, मालवाहतूकीत माल कमी आणि नागरीकांची वाहतूक जास्त होतेय का, अशा सर्वच बाबतीत फेर आढाव्याची गरज आहे. शहर केवळ स्वच्छ आणि सुरक्षीत नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने देखील उत्तम राहीले पाहिजे, परंतु रूग्ण संख्या वाढत गेली आणि त्यातून नाशिककरांच्या जीवावर बेतले तर जबाबदारी कोण पत्कारणार? की टोलवा टोलवीच चालणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिस