शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेतील ‘टक्केवारी’ थांबणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:09 IST

नाशिक- राजकारण आणि टक्केवारी इतकी एकरूप झालेली आहेत की, महापालिकेचे कामकाज त्याशिवाय चालत नाही. ही टक्केवारी इतकी घट्ट झाली आहे की कोणी कोणाला आरोप केले तरी तेही फिट्ट बसु शकतात. गेल्या ‘आॅनलाईन’ महासभेत ‘फिजीकल’ गोंधळ घालणाऱ्या विरोधकांपैकी काहींनी महापौर सतीश कुलकर्णी आणि सत्तारूढ गटावर थेट टक्केवारीचे आरोप केले आणि महापौरांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. हा प्रकार नवा नाही. एकुणच महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक पासून सुरू झालेली टक्केवारीची चर्चा आजही कायम आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची विश्वासार्हता मात्र कमी होत गेली आहे.

ठळक मुद्देराजकिय वादामुळे पुन्हा चर्चालोकप्रतिनिधींच्या विश्वासार्हतेत घट

संजय पाठक, नाशिक- राजकारण आणि टक्केवारी इतकी एकरूप झालेली आहेत की, महापालिकेचे कामकाज त्याशिवाय चालत नाही. ही टक्केवारी इतकी घट्ट झाली आहे की कोणी कोणाला आरोप केले तरी तेही फिट्ट बसु शकतात. गेल्या ‘आॅनलाईन’ महासभेत ‘फिजीकल’ गोंधळ घालणाऱ्या विरोधकांपैकी काहींनी महापौर सतीश कुलकर्णी आणि सत्तारूढ गटावर थेट टक्केवारीचे आरोप केले आणि महापौरांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. हा प्रकार नवा नाही. एकुणच महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक पासून सुरू झालेली टक्केवारीची चर्चा आजही कायम आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची विश्वासार्हता मात्र कमी होत गेली आहे.

महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत गेल्या कुंभमेळ्यातील साडे चार कोटी रूपयांचे वाढीव देयके पाच वर्षाच्या विलंबानंतर देण्याचा प्रस्ताव होता. त्यातून समर्थन आणि विरोध असे सुरू असताना महापौरांनी तो मंजुर केला त्यामुळे विरोधकांनी ज्या ठिकाणी महापौर आसनस्थ होते तेथे जाऊन गोंधळ घातला. शिवाय राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी महापौरांसह सत्तारूढ भाजप पदाधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप केला. महापौरांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेच परंतु त्यांच्यावरही तेच आरोप केले. उलट महासभेत ‘बोलणाºयांचे’ हट्टच संशयास्पद असल्याचा आरोप केला. त्यामुळे महासभेत बोलणाºया शब्दांचे ‘मोल’ही आपसूकच अधोरेखीत झाले.

महापालिकेत कोणत्या ठेकेदाराला टक्केवारी दिल्याशिवाय काम करता येत नाही अशी एक सार्वत्रिक चर्चा असते. ही चर्चा तशी महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकपासून सुरू झाली आणि ती आज २८ वर्षांनंतर ती कायम आहे. कोणत्याही कामासाठी महापालिकेत निविदा मागवल्या जातात. आणि मग त्याचे अर्थकारण सुरू होते. सोयीच्या ठेकेदाराला काम मिळाले नाही की मग निविदा प्रक्रियेतील गोंधळ शोधून हेत्वारोप सुरू होतात आणि वाद गाजतो. कित्येकदा काम सुरू झाल्यानंतर त्यातील नित्कृष्ट दर्जा अचानक दिसतो आणि नंतर मात्र ठेकेदार आणि आरोपकर्ता यांची ‘भेट’ झाली की, नित्कृष्ट दर्जा नंतर ‘उत्कृष्ट’ होतो. संबंधीत नगरसेवकांचा आवाजच शांत होत असतो. याचा अर्थ ठेकेदार सर्व नियमानुसार काम करतात आणि प्रशासन देखील पारदर्शक पध्दतीने काम करते असे होत नाही. मात्र, साखळी तुटली की गोंधळाला सुरूवात होते.

महापालिकेत आजवर गैरव्यवहाराचे असंख्य विषय गाजले. परंतु एक पावसाळी गटार योजनेतील कारवाईचे प्रकरण वगळता बाकी सारेच शांत झाले. पावसाळी गटार योजनेचा देखील अहवाल कालांतराने गुंडाळण्यात आला. केंद्र शासनाच्या घरकुल योजनेत तर आधी विरोध करणारे आता त्याविषयी बोलत तर नाहीच परंतु काही जण घोटाळा झालाच नाही असेही दावे करत आहेत. नगररचना विभागातील टीडीआर, एआर या विषयांतील घोटाळे देखील असेच नगरसेवक आवाज उठवतात, पत्र देतात आणि नंतर मात्र त्याविषयी काहीच बोलत नाही. अलिकडेच देवळाली येथील एका भूखंडाचा मोबदला देताना १०० कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा विषय गाजला. हा विषय २०१८ मध्ये तर वादग्रस्त ठरला. त्यांनतर आता २०२० मध्येच पुन्हा चर्चेत आला. यादरम्यान, मध्यंतरीच्या काळात आरोप करणारे कुठे गेले हेच नागरीकांना कळले नाही.

महासभेतील लक्ष्यवेधी, आंदोलने, आक्षेप नोंदवणे आणि प्रसंगी न्यायालयात जाणे ही सर्व आयुधे लोकशाहीने दिली आहेत, मात्र प्रत्यक्षात ज्या पध्दतीने त्याचा वापर सुरू असतो, तो बघता एखाद्या नगरसेवकाने प्रामाणिकपणे आणि तळमळीने प्रश्न मांडले तर तर त्याविषयी शंका घेतली जाते आणि त्यातून नगरसेवकांची विश्वासार्हता किती लयास गेली आहे, हेच स्पष्ट होते. आता अवघ्या दीड वर्षावर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका आल्या आहेत. त्यामुळे आता असे अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होतील.त्यातून राजकिय पक्ष आणि नगरसेवकांनी पाच वर्षात काय कमवले हे खºया अर्थाने बाहेर येणे शक्य आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार